Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभाविपच्या सदस्यता अभियानाचा नवा विक्रम; ६० हून अधिक महाविद्यालयांतून ५० हजार विद्यार्थी जोडले

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मुंबई महानगरातील सदस्यता अभियानाने ५० हजार सदस्यत्वाचा टप्पा पार केला आहे. ६० हून अधिक महाविद्यालयांमध्ये अभियान राबवून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात आला.

  • By विवेक
Updated On: Aug 31, 2026 | 09:28 PM
अभाविपच्या सदस्यता अभियानाचा नवा विक्रम; ६० हून अधिक महाविद्यालयांतून ५० हजार विद्यार्थी जोडले

अभाविपच्या सदस्यता अभियानाचा नवा विक्रम; ६० हून अधिक महाविद्यालयांतून ५० हजार विद्यार्थी जोडले

Follow Us
Follow Us:
  • अभाविपच्या मुंबई सदस्यता अभियानात ५० हजार विद्यार्थ्यांची नोंद
  • ६० हून अधिक महाविद्यालयांमध्ये अभियान राबवले
  • विद्यार्थीहित आणि राष्ट्रनिर्माणाच्या मुद्द्यांवर अभाविपचा भर
 

नीता परब : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) मुंबई महानगरातील सदस्यता अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, ६० हून अधिक महाविद्यालयांमध्ये अभियान राबवत ५० हजार सदस्यत्वाचा महत्त्वपूर्ण टप्पा पार करण्यात आला आहे. विद्यार्थीहिताच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करण्यासोबतच राष्ट्रहित आणि राष्ट्रनिर्माणाच्या विचारांशी विद्यार्थ्यांना जोडण्याच्या अभाविपच्या प्रयत्नांना मिळालेला हा सकारात्मक प्रतिसाद असल्याचे अभाविपकडून सांगण्यात अाले.

िवद्यार्थ्यांबराेबर प्रत्यक्ष संवाद

मुंबई महानगरातील विविध महाविद्यालयांमध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात अाला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच सामाजिक प्रश्नांची माहिती घेत त्यांना अभाविपच्या कार्याची भूमिका समजावून सांगण्यात आली व विद्यार्थ्यांनीही या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मोठ्या संख्येने अभाविपचे सदस्यत्व स्वीकारले, असल्याचे अभाविपचे म्हणणे अाहे.

विद्यार्थी शक्तीच्या संघटित सहभागाचे प्रतीक

५० हजार सदस्यत्वाचा टप्पा हा केवळ एक आकडा नसून विद्यार्थी शक्तीच्या संघटित सहभागाचे प्रतीक आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या, शैक्षणिक सुविधा, विद्यार्थी हक्क, महाविद्यालयीन परिसरातील विविध प्रश्न यासाठी आवाज उठविण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्राप्रती जबाबदारीची भावना निर्माण करण्याचे काम अभाविपच्या माध्यमातून केले जात असल्याचे परिषदेचे म्हणणे अाहे.

Maharashtra Politics: ‘राहुल गांधींनी भाजपाची झोप उडवली’; हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर पलटवार, ‘Get Well Soon’ म्हणत लगावला टोला

५० हजार विद्यार्थी अभाविपशी जोडले जाणे ही अत्यंत समाधानाची बाब

मुंबई महानगर मंत्री अभिषेक पवार म्हणाले, “मुंबईतील ६० हून अधिक महाविद्यालयांमध्ये राबविण्यात आलेल्या सदस्यता अभियानातून ५० हजार विद्यार्थी अभाविपशी जोडले जाणे ही अत्यंत समाधानाची बाब आहे. हा आकडा विद्यार्थी शक्तीने विद्यार्थीहित आणि राष्ट्रहिताच्या विचारांना दिलेली साथ दर्शवितो. या सदस्यांच्या सहभागातून आगामी काळात विद्यार्थीहिताचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”

या अभियानाच्या यशामागे अभाविपच्या प्रत्येक कार्यकर्त्याची मेहनत आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत महाविद्यालयांच्या कॅम्पसच्या प्रवेशद्वारांवर उभे राहून कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कोणत्याही प्रकारचा आग्रह न करता विद्यार्थ्यांना अभाविपच्या कार्याची माहिती देत सदस्यत्वाचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने दिलेला प्रतिसाद हीच या अभियानाची खरी ताकद आहे.”

Maratha Reservation : ‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात

विद्यार्थीहित आणि राष्ट्रहित यांची सांगड घालत सक्षम युवा शक्ती घडविणे हा अभाविपच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. विद्यार्थी हा केवळ महाविद्यालयीन प्रश्नांपुरता मर्यादित न राहता समाज आणि राष्ट्राच्या भवितव्यात सक्रिय योगदान देणारा घटक आहे, या भूमिकेतून विद्यार्थ्यांना संघटित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

५० हजार सदस्यत्वाच्या या टप्प्यानंतर मुंबई महानगरातील अभाविपचे कार्य अधिक व्यापक करण्याचा निर्धार करण्यात आला असून, नव्याने जोडलेल्या सदस्यांच्या माध्यमातून विद्यार्थीहिताचे प्रश्न, सामाजिक उपक्रम, शैक्षणिक विषय आणि राष्ट्रनिर्माणाशी संबंधित विविध उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.

५० हजार सदस्यत्वाचा हा टप्पा अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ असून, विद्यार्थीहिताच्या कार्याला आणि राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पाला मिळालेली युवा शक्तीची नवी ऊर्जा असल्याचे सांगण्यात अाले.

Web Title: Mumbai news abvp membership campaign 50000 students 60 colleges

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 09:28 PM

Topics:  

  • ABVP
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Samruddhi Mahamarg: अपघात अन् लुटमारीच्या घटनांनी प्रवास धोकादायक; अत्याधुनिक रुग्णालय आणि स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी
1

Samruddhi Mahamarg: अपघात अन् लुटमारीच्या घटनांनी प्रवास धोकादायक; अत्याधुनिक रुग्णालय आणि स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी

Mumbai News: मुंबईकरांच्या कटिंगला साखरेचा कडू घोट; तलफ कशी भागणार? वाढत्या महागाई खिशावर भार
2

Mumbai News: मुंबईकरांच्या कटिंगला साखरेचा कडू घोट; तलफ कशी भागणार? वाढत्या महागाई खिशावर भार

Maharashtra Breaking News Today 2026:  दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!
3

Maharashtra Breaking News Today 2026: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!

रुग्णालयांची दर सहा महिन्यांनी सुरक्षा तपासणी! आगीचा धोका; अनेक ठिकाणी आढळल्या त्रुटी, अमरावती घटनेनंतर यंत्रणेला जाग
4

रुग्णालयांची दर सहा महिन्यांनी सुरक्षा तपासणी! आगीचा धोका; अनेक ठिकाणी आढळल्या त्रुटी, अमरावती घटनेनंतर यंत्रणेला जाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.