मतदानाच्या दिवशी मुंबईत कामगारांना पगारी सुट्टी द्या (फोटो सौजन्य-X)
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असून 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात 288 मतदारसंघात मतदान होणार आहे. राजधानी मुंबईतील 36 मतदारसंघांसाठी एकाच दिवशी मतदान होत आहे. याच पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई परिसरातील (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) सर्व व्यवसाय, व्यापार, औद्योगिक गट, समूह, कंपन्या आणि संस्था, औद्योगिक उपक्रम आणि इतर आस्थापनेमध्ये काम करणारे कामगार, कर्मचारी आणि अधिकारी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली.तसेच ही सार्वजनिक सुट्टी संबंधित नियोक्त्यांसाठी बंधनकारक राहिल, असे आदेश जारी केले जाणार आहेत जे दैनंदिन वेतन देण्याबाबत संबंधित मालकांना बंधनकारक असतील. या नियमांचे पालन न करणाऱ्या नोकरदारांवर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिल्या आहेत.
हे सुद्धा वाचा: केंद्रात सत्तेत असलेल्या ‘या’ पक्षाने घेतली भाजपविरोधी भूमिका; अमित ठाकरेंना सोडून सदा सरवणकरांना दिला पाठिंबा
माननीय भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई परिसरात (मुंबई उपनगर जिल्हा) मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचपार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व मतदारांना विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदानाचा हक्क बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
• निवडणुकीच्या मतदान क्षेत्रात कोणताही व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या आणि राज्य विधानसभा निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी म्हणजे बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी दररोज सुट्टी देण्यात यावी. .
• सर्व औद्योगिक गट, कॉर्पोरेशन, कंपन्या आणि संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांना लागू राहतील.
• या सुटीच्या बदल्यात संबंधित व्यक्तीच्या वेतनात कोणत्याही प्रकारची कपात करता येणार नाही. या नियमांचे किंवा तरतुदींचे कोणत्याही नियोक्त्याने उल्लंघन केल्यास त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार कारवाई केली जाईल.
• लोकप्रतिनिधी कायदा- 1951 च्या कलम 135 (b) नुसार, कोणत्याही मतदाराची कर्तव्यात अनुपस्थिती त्याच्या नोकरीच्या संबंधात धोकादायक किंवा हानिकारक असेल तर त्याच्याविरुद्ध कोणतीही उल्लंघनात्मक कारवाई केली जाणार नाही.
• तसेच, अपवादात्मक परिस्थितीत, कामगार, कर्मचारी, अधिकारी इत्यादींना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास, त्यांना किमान चार तासांची सवल दिली जाईल. मात्र, अशी सूट देताना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असेल.
• सुटी किंवा सवलत प्राप्त न झाल्याने एखाद्या व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित नियोक्त्याविरोधात योग्य कारवाई करण्यात येईल. त्यामुळे, उद्योग विभाग अंतर्गत येणारे सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम आदी आस्थापनांनी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून दिलेल्या या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देशही गगराणी यांनी दिले आहेत.
हे सुद्धा वाचा: राज्यात 1 लाख 427 मतदान केंद्रांची उभारणी ! आदिवासी, दुर्गम भागावर विशेष लक्ष