• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Mahavikas Aghadi On Alert After Aaps Defeat Reconsideration For Municipal Elections Nras

आपच्या पराभवानंतर महाविकास आघाडी अलर्टवर; महापालिका निवडणुकांसाठी होणार फेरविचार

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा, 257 नगरपालिका आणि 289 नगरपंचायतींच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 09, 2025 | 05:02 PM
आपच्या पराभवानंतर महाविकास आघाडी अलर्टवर; महापालिका निवडणुकांसाठी होणार फेरविचार

Photo Credit- Social Media आपच्या पराभवानंतर महाविकास आघाडीत महापालिका निवडणुकांसाठी होणार फेरविचार

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई:   दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर विरोधी पक्षांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या निकालांचा परिणाम यंदा होणाऱ्या बिहार विधानसभा तसेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर ‘इंडिया’ आघाडीत नव्याने विचारमंथन सुरू होण्याची शक्यता असून, अनेकांनी एकत्र न लढल्याने काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे नुकसान झाल्याचे स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतील पक्ष स्वतंत्रपणे नागरी निवडणुका लढवण्याच्या तयारीत होते. मात्र, दिल्लीतील निकाल पाहता एमव्हीएला नव्याने रणनीती आखावी लागणार आहे. शिवसेना (यूबीटी) खासदार संजय राऊत हे स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम होते. त्यांनी वारंवार विधान करून सांगितले होते की, उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊ शकतात. मात्र, दिल्ली निकालानंतर ही भूमिका पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे.

Shraddha Walkar : प्रियकराकडून लेकीचे ३५ तुकडे, हत्येनं खचलेल्या वडिलांचं निधन

सर्व राजकीय पक्ष आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारीला लागले आहेत. भाजपमध्ये कोअर कमिटी, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांसोबत नियमित बैठका घेतल्या जात आहेत. शिवसेना (यूबीटी) कडूनही मुंबई महापालिका निवडणुकीसाठी विशेष तयारी सुरू असून उद्धव ठाकरे यांनी नुकतीच प्रमुख नेत्यांसोबत ऑनलाइन बैठक घेतली. महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले की, दिल्लीच्या जनतेने संधीसाधू राजकारणाला धडा शिकवला आहे. फसव्या घोषणांच्या आडून काम करणाऱ्या नेतृत्वाला लोकांनी स्पष्ट संदेश दिला आहे.

मंत्री शेलार म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन दिल्लीने राष्ट्रवादी विचारधारेला मोठा पाठिंबा दिला आहे. राहुल गांधींच्या काँग्रेसला लोकांनी साफ नाकारले. महाराष्ट्र आणि दिल्ली जिंकल्यानंतर, आता आर्थिक राजधानी मुंबईतही हा बदल अटळ आहे. महापालिकेत २५ वर्षांपासून भ्रष्टाचार करणाऱ्यांना घरी पाठवले जाईल!”

Chhattisgarh Naxalites Killed: 31 नक्षलवाद्यांना कंठस्नान; देशातून नक्षलवाद

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा, 257 नगरपालिका आणि 289 नगरपंचायतींच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे या निवडणुका वेळेवर झाल्या नाहीत, परिणामी स्थानिक प्रशासन अधिकाऱ्यांच्या हातात गेले आहे. दरम्यान,  27 एप्रिल 2020 रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला, तर सर्वात शेवटी 27 डिसेंबर 2023 रोजी अहिल्यानगर महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला. मात्र, या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत.

Prashant Bhushan on Delhi: हा अंंताचा प्रारंभ…; आपच्या पराभवानंतर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचे सूचक विधान

लोकप्रतिनिधी नसल्याने विकासकामे ठप्प

स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी नसल्याने वॉर्ड पातळीवरील अनेक विकासकामे रखडली आहेत. सध्या संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अधिकाऱ्यांच्या हाती आहे, त्यामुळे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकशाहीतील निवडून आलेले प्रतिनिधीच नाहीत. निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात म्हणून काही याचिकाकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. लोकशाहीतील महत्त्वाचा भाग असलेल्या या निवडणुकांवर विलंब झाल्याने राजकीय प्रक्रियेतही अडथळे निर्माण झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून नवीन नेतृत्व उदयास येते, मात्र सध्याच्या परिस्थितीत ही संधी मिळत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांवर लवकर निर्णय होण्याची गरज आहे.

Web Title: Mahavikas aghadi on alert after aaps defeat reconsideration for municipal elections nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • Mahavikas Aghadi Politics

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?

ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?

Feb 17, 2026 | 02:07 PM
Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…

Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…

Feb 17, 2026 | 02:04 PM
Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे

Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे

Feb 17, 2026 | 02:03 PM
Salim Khan यांची प्रकृती अचानक बिघडली; Salman Khan वडिलांच्या काळजीने तातडीने रूग्णालयात

Salim Khan यांची प्रकृती अचानक बिघडली; Salman Khan वडिलांच्या काळजीने तातडीने रूग्णालयात

Feb 17, 2026 | 02:01 PM
Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

Feb 17, 2026 | 01:55 PM
गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण गोष्टी, रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत

गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण गोष्टी, रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत

Feb 17, 2026 | 01:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.