
nashik news loose-edible-oil-sale-ban-traders-demand-lifting-ban-sampling-twice-a-month
पूर्वी शेंगदाणा तेल आणि इतर तेलांच्या (उदा. पाम तेल, सोयाबीन तेल) दरात मोठी तफावत असायची, ज्यामुळे भेसळीची शक्यता जास्त असायची. मात्र, सध्या परिस्थिती बदलली असून शेंगदाणा तेल व इतर तेलांच्या किमतीत फारसा फरक उरलेला नाही. त्यामुळे व्यापारी भेसळ करत नाहीत. तरीही कुणी दोषी आढळल्यास त्याला नक्कीच शिक्षा व्हावी, हीच व्यापाऱ्यांची भूमिका आहे, असे पटेल यांनी स्पष्ट केले.
Nashik Kumbh Mela Works: : “विकास हवा, पण जीव नको!” ओव्हरलोड वाहनांविरोधात नाशिककर आक्रमक!
दरम्यान, शासनाने हा निर्णय घेताना गोरगरिबांचा आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचा अजिबात विचार कैला गेलेला नाही. दररोज ४०० रुपये कमावणाऱ्या मजुराने २०० रुपयांची १ किलो तेलाची पिशवी खरेदी केली, तर उरलेल्या पैशात भाजी, मीठ, मिरची, डाळ आणि तांदूळ कसे खरेदी करायचे? मग
शासनाच्या आकडेवारीनुसार वर्षभरात १.२४७ तेलाचे नमुने घेण्यात आले. त्यातील १३ नमुने दोषी आढळले. हे नमुने किरकोळ विक्रेत्यांचे आहेत की कुणाचे? हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी करून तिथे भेसळ किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास नक्कीच कारवाई करावी: परंतु संपूर्ण बंदीचा हा निर्णय प्रशासनाने तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी होत आहे. या निर्णयामुळे दुकानांवर किरकोळ विक्रेते आणि ग्राहक यांच्यात दररोज तीव्र वाद निर्माण होत आहेत.
अशा गोरगरिबांनी जगायचे कसे, असा अत्यंत संवेदनशील सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला. राज्यात सुट्या तेलावर अचानक बंदी आणल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बहुतांश व्यापारी हे गुजरातहून खाद्य तेलाचे टैंकर मागवत असतात, ज्या दिवशी हा निर्णय जाहीर झाला त्या दिवशी गुजरातहून निघालेले ८ ते १० तेलाचे टैंकर परत पाठवावे लागले. परिणामी, व्यावसायिकांना एका गाडीमागे जवळपास १ लाख रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने या सरसकट बंदीचा पुनर्विचार करावा, अशी मागणी व्यापाऱ्याऱ्यांकडून केली जात आहे.
अधिकाऱ्यांनी महिन्यातून दोन वेळा तेलाचे नमुने घ्यावेत. त्यात कुणी दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई करावी. मात्र काही विक्रेत्यांमुळे इतर हजारो विक्रेते आणि लाखो गोरगरीबांना त्रास होईल, असा निर्णय घेऊ नये.- प्रकाश पटेल, अध्यक्ष, खाद्य तेल विक्रेता असोसिएशन