Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक! टाळ-मृदंगाच्या निनादात शेतकरी उतरले थेट कालव्यात

अहिल्यानगर मधील निळवंडे येथील धरणाच्या पाणी प्रश्नावरून शेतकरी व स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 15, 2026 | 08:35 PM
Ahilyanagar News: पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक! टाळ-मृदंगाच्या निनादात शेतकरी उतरले थेट कालव्यात
Follow Us
Follow Us:

अकोलेमधील निळवंडे येथील धरणाच्या पाणी प्रश्नावरून पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहे. प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शेतकरी व स्थानिक नागरिकांनी सोमवारी रात्रीपासून धामणगाव रोडवरील घोलप नजिक असणाऱ्या धरणाच्या कालव्यामध्ये बसून शेतकऱ्यांनी टाळ मृदुंग, भजनाच्या साथीने आंदोलन सुरू केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

निळवंडे धरणाच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी उशीरा निळवंडेच्या उजव्या कालव्यात आंदोलकांनी तंबू ठोकून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. पाण्याचे योग्य वाटप, कालव्यांमध्ये वेळेवर पाणी सोडणे तसेच शेतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी आता या भागातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. अभी नहीं तो कभी नही, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

Amravati Scandal: “सुनावणी नको, तारीख नको सरळ ‘एन्काउंटर’….”, अमरावती Video प्रकरणावर माजी खासदार नवनीत राणा यांचा संताप

पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

आंदोलनादरम्यान पाणी आमच्या हक्काचं आहे, नाही कुणाच्या बापाचं, आमचं पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे, असा ठाम इशारा संघर्ष समितीने दिला. तसेच पालकमंत्र्यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालावे, अशी मागणीही करण्यात आली. यापूर्वी शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न मांडला होता, मात्र अद्याप ठोस कारवाई न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शेती आमची पण पाणी डोळयासमोरून जाते

धरण व बंधारे आमच्या तालुक्यात, शेती आमची; पण पाणी आमच्या डोळ्यासमोरून वाहून जाते आणि आम्हाला मिळत नाही. अजून किती बळी गेल्यावर आम्हाला न्याय मिळणार?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

कालवे उध्वस्त, चाक बंदचा निर्णय

आम्हाला हक्काचे पाणी द्या अशी मागणी करत या आंदोलनाची दखल घेतली न गेल्यास आंदोलनकर्ते शेतकरी कालवा उद्ध्वस्त करतील. या पलीकडे जाऊन खाली पाणी जाऊन देणार नाही, यासाठी प्रसंगी धरणाचे चाक देखील बंद करण्याचा एकमुखी निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.

भर उन्हाळ्यात फोडला पाण्यासाठी टाहो

आंदोलनात कम्युनिस्ट नेते डॉ. अजित नवले, शिवसेना शिंदे गटाचे नेते बाळासाहेब भोर, अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भानूदास तिकांडे, अगस्ती पतसंस्थेचे उपाध्यक्ष गणेश पापळ, अण्णा शेटे, माजी उपसरपंच अशोक देशमुख यांच्यासह अनेक शेतकरी कालव्यामध्ये उपोषणास बसले आहेत. या ठिकाणी भजन व गायन करत शेतकरी भर उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी टाहो फोडत आहे.

मंत्री विखे यांच्याकडून मागणी मान्य

प्रवरानगर : निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून १५ एप्रिलपासून पाणी सोडण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. तसेच डाव्या कालव्याचे आवर्तन २५ एप्रिलपासून निश्चित केले आहे. लाभक्षेत्रातील पाणी टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न विचारात घेऊन हा निर्णय घेतला आहे. उच्चस्तरीय कालव्यावरील शेतकऱ्यांनाही याचा लाभमिळावा, ही मागणी मंत्री विखे पाटील यांनी मान्य केली आहे. यामुळे अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी आणि कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अकोलेतील शेतकऱ्यांनी नुकतीच मंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी जलसंपदा अधिकाऱ्यांना तातडीने पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: Nilwande dam farmers protest water issue ahilyanagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke Update:  ‘देश जागा होतोय…’; जंतर मंतरवरील व्हिडीओ शेअर करत अभिजीत दिपकेंची गर्जना
1

Abhijeet Dipke Update: ‘देश जागा होतोय…’; जंतर मंतरवरील व्हिडीओ शेअर करत अभिजीत दिपकेंची गर्जना

Farmers News : शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; मका-तुरीची विक्रमी पेरणी, मात्र पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण!
2

Farmers News : शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट; मका-तुरीची विक्रमी पेरणी, मात्र पावसाची दांडी ठरतेय चिंतेचे कारण!

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल
3

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी
4

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.