
Abhijeet Dipke Update: दिल्लीतील संसद भवन मार्गावरील हिंसक आंदोलनानंतर आज (22 जुलै) तिसऱ्या दिवशीही कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन जोरदारपणे सुरू आहे. विद्यार्थ्यांना झालेल्या निर्दयी मारहाण झाली होती. त्यानंतर हे आंदोलन मागे घेतले जाऊ शकते. असं बोललं जाऊ लागलं. पण त्यानंतरही विद्यार्थ्यांचे मनोबल कायम असल्याचे दिसत आहे. त्यातच सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार केल्याने या आंदोलनात नवे प्राण फुंकले आहे.
दरम्यान आज सकाळी सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. तोच व्हिडीओ रिपोस्ट करत अभिजीत दिपके यांनी एक कॅप्शन दिली आहे. “देश जागा होत आहे.” असे म्हटलं आहे.
The nation has awaken! https://t.co/GDMdmHqxDy — Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) July 22, 2026
गेल्या महिनाभरापासून कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन सुरू आहे. परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटी प्रकरणे आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागण्यांसाठी ‘चलो संसद’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात देशभरातून हजारो विद्यार्थी आणि तरुण सहभागी झाले.
दुपारच्या सुमारास म मोर्चा संसदेकडे निघाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतरही अनेक ठिकाणी पोलिसांनी विद्यार्थ्यांना धक्काबुक्की, लाठीचार्ज आणि अश्रुधूराचा वापर झाल्याचे वृत्त समोर आले. या संघर्षात आंदोलक आणि पोलिस अशा दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.
परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणि व्यापक सुधारणा.
पेपरफुटी प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई.
आंदोलकांच्या इतर शैक्षणिक आणि विद्यार्थीहिताच्या मागण्यांवर तातडीने निर्णय.
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत CJP प्रतिनिधीं आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्याशी चर्चाही केली. मात्र, आंदोलकांनी केवळ चर्चेवर समाधान न मानता ठोस निर्णयाची मागणी कायम ठेवली. २० जुलैच्ा पोलिस कारवाईनंतरही दुसऱ्या दिवशी जंतर-मंतरवर पुन्हा मोठ्या संख्येने आंदोलक जमू लागले. CJPने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, पुढील आंदोलनाची रणनीती जाहीर केली आहे.
जंतर-मंतरवर CJP चे आंदोलन अजूनही सुरू असून शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी कायम आहे. आंदोलकांनी सध्या संसदेकडे पुन्हा मोर्चा न काढता जंतर-मंतरवरच धरणे सुरू ठेवणार असल्याचे म्हटले आहे. 20 जुलै रोजी ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांची सुटका झाल्यानंतर दिल्ली पोलिस मुख्यालयाबाहेरचे प्रस्तावित आंदोलन मागे घेण्यात आले.