
Nizam-era farm road in Metha suddenly disappears from the map, villagers attack
वंशपरंपरागत रस्त्यासाठी ग्रामस्थ एकवटले, आंदोलनाची चेतावणी
यामुळे शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी १६ फेब्रुवारी रोजीही ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात निवेदन दिले होते. त्यानंतर तलाठी यांनी पंचनामा केला. मात्र मंडळ अधिकारी पिपळदरी यांच्या नकाशात रस्त्याची नौद जुळत नसल्याचे सांगण्यात आले, आश्चर्याची बाब म्हणजे गुगल मॅपवर स्पष्ट दिसणारा रस्ता अधिकाऱ्यांना पंचनाम्यात दिसला नाही, याचाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. अधिका-यांच्या पंचनाम्यावरूनच रस्ता चोरीला गेल्याचे स्पष्ट होते,” असा आरोप करत शेतकऱ्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल
करून रस्त्याचा शोध घेण्याची मागणी केली आहे.
हे देखील वाचा : सुनेत्रा पवार विधानसभेच्या रिंगणात! बारामती पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीची मोठी रणनीती
सदर रस्ता बंद झाल्याने शेती कामासाठी ये-जा करणे कठीण झाले असून मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले. निवेदनावर दिलीप नागरे, गुलाब लोंढे, ज्ञानेश्वर लोंढे, अमोल लोंढे, भीमराव शिंदे, सदाशिव शिंदे, शेषराव ढोकणे, नारायण शिंदे, आनंद शिंदे, चांदु लोंढे, अनिता आखरे, माधव लोंढे, शिवाजी लोंढे, कुंडलिक लोंढे, उत्तम लोंढे, गणेश लोढे, मुक्ताबाई कुबडे, विश्वनाथ कुरवाडे, अशोक लोढे, गीता लोंढे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हे देखील वाचा : ‘VSR’ला क्लीन चीट देऊन वाचवण्याचा प्रयत्न…; आमदार रोहित पवार यांचा अजित पवारांच्या अपघातावर संशय
लागवड व्यवस्थापन कार्यशाळा
आँढा नागनाथ येथे राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, पुणे व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने २४ फेब्रुवारी रोजी हळद व सोयाबीन लागवड व्यवस्थापन विषयावर एकदिवसीय कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी नारायण पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून मारोतराव खांडेकर, नितीन जिंतूरकर व सोपान शिंदे उपस्थित होते. डॉ. अनिल ओळंबे यांनी हळद लागवड, रोगमुक्त बियाणे व पाणी व्यवस्थापन तर डॉ. राजेश भालेराव यांनी सोयाबीनच्या प्रगत वाण, जमिनीची मशागत व खत व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. भागवत सपकाळ यांनी संस्थेच्या प्रशिक्षण उपक्रमांची माहिती दिली.
उत्पादनवाढ, रोगनियंत्रण व प्रक्रिया उद्योगांवर विशेष भर देण्यात आला. अनेक शेतकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यावेळी तज्ज्ञांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पीक पद्धतीत आवश्यक बदल करण्याचे आवाहन यावेळी करण्यता आले.