व्हीएसआर विमान कंपनीवरील डीजीसीए कारवाईबाबत आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली (फोटो - सोशल मीडिया)
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून विधीमंडळाच्या आवारामध्ये आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “अजित पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा केवळ एका कुटुंबाचे नुकसान नसून तर तो संपूर्ण राज्यासाठी एक काळा दिवस होता. आजही अनेक सामान्य लोकांना प्रेमापोटी वाटते की दादा कुठेतरी बाहेर येतील आणि आपल्याला भेटतील. पण दुर्दैवाने तो दिवस येणार नाही, हे वास्तव आपल्याला स्वीकारावे लागेल. जनतेची आणि सामान्य लोकांची हीच इच्छा आहे की, या अपघातामागील सत्य समोर यावे. हा केवळ अपघात होता की घातपात? यात नक्की काय घडले? कुणी केले? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत,’ अशा भावना रोहित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची मोठी कारवाई; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
पुढे ते म्हणाले की, “लोक चहाच्या टपरीपासून सोशल मीडियापर्यंत या अपघातावर चर्चा सुरु आहे. आणि दादांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली जात आहे. २८ जानेवारीला जेव्हा अजित दादांचे पार्थिव रुग्णालयात होते, त्याच दिवशी दुपारी १ वाजून ३६ मिनिटांनी डीजीसीएने पहिला अहवाल दिला. या अहवालात लेव्हल १ ची कोणतीही अडचण नसल्याचे सांगून संबंधित विमान कंपनीला (VSR) क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला. ज्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करत आहोत, त्यांनीही दुर्दैवाने या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र काल आलेल्या अहवालात डीजीसीएने काही त्रुटी मान्य केल्या आहेत, पण ते यश नखाएवढे आहे,’ अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.
हे देखील वाचा : शरद पवार हे निवडणुकीला उभे राहणार; राज्यसभा निवडणूकीवरुन मविआत वादंग? खासदार राऊत स्पष्टच बोलले
पुढे ते म्हणाले की, “कालच्या अहवालात त्यांना अनेक त्रुटी जाणवल्या. विमान उडवायच्या आधी त्याला एक सर्टिफिकेट असतं, त्यात त्यांना त्रुटी दिसल्या. त्याच्या सुरक्षेबद्दल त्रुटी दिसल्या. फ्लाईटमध्येही दिसल्या. तुम्ही आता जे बोलताय त्यातून एक नेता गेला. या रिपोर्टमध्ये आताही ते व्हिएसआरला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सरकार फक्त ॲक्शन घेतली आहे, असे दाखवत आहे. पण प्रत्यक्षात विमान कंपनीला त्यांच्या त्रुटी दुरुस्त करून पुन्हा विमान उडवण्याची अप्रत्यक्ष परवानगी दिली आहे,” असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.






