
चटपटीत पाणीपुरी विक्री ठिकाणी साप..., अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उघड्यावर ठेवलेले साहित्य, स्वच्छतेचा अभाव, पाण्याची गुणवत्ता आणि अन्न हाताळण्याची पद्धत यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे. या घटनेनंतर “रस्त्यावरील पाणीपुरी खाणे खरंच सुरक्षित आहे का?” असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.