Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आषाढी वारीची तयारी तर जोरदार; मात्र पंढरपूर शहरातील रस्त्यांची झालीये अक्षरशः चाळण

पंढरपूरमध्ये दररोज हजारो भाविक येत असतात. तसेच आषाढी वारी लवकरच सुरु होणार आहे यामुळे लाखो वारकरी जमत असतात. मात्र पंढरपूरमधील रस्त्यांची अवस्था बिकट असल्याचे दिसून येत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 08, 2025 | 12:11 PM
Pandharpur Roads in bad condition, potholes repair before Ashadhi wari 2025

Pandharpur Roads in bad condition, potholes repair before Ashadhi wari 2025

Follow Us
Close
Follow Us:
पंढरपूर – नवनाथ खिलारे : लवकरच आषाढी वारी सुरु होणार आहे. याच पार्श्वभूमीवर देहू आणि आळंदीसह पालखीमार्गाची डागडुजी केली जात आहे. मात्र वैष्णवांचा मेळा जमत असलेल्या पंढरपूर शहरातील रस्त्यांची मात्र अत्यंत बिकट अशी अवस्था झाली आहे. पावसाळा सुरू होताच या रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळत आहे. खोदकामानंतर वेळेत दुरुस्ती न केल्यामुळे आणि ऐन पावसात डांबरीकरणाचे घेतलेले काम पावसामुळे वाहून गेल्याने नागरिकांचा त्रास अधिकच वाढला आहे.
राज्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळे अनेक रस्ते हे खराब झाले असून त्याचे डांबरीकरण निघाले आहे. पंढरपूरमधील रस्त्यांची वाईट अवस्था दिसून येत आहे. सावरकर चौक ते सरगंम चौक दरम्यान काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेले हॉटमिक्सिंग पाहता पाहता पावसात वाहून गेले. यापूर्वी अशाचप्रकारे भर पावसात इंदिरा गांधी चौक ते अंबाबाई पटांगण चौक कार्तिक वारी दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. ते देखील पावसात वाहून गेले.  बाजारपेठेतील रस्ते देखील दुरूस्त न केल्यामुळे ते खड्डेमय बनलेले आहेत. सरकारी कामांचे नियोजन आणि गुणवत्ता यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 
मनिषा नगर अन्य भागांतही तीच परिस्थिती
उपनगरातील विविध भागांमध्ये गेल्या काही वर्षांपासून जलवाहिनी, सांडपाणी आणि वीजवाहिनीच्या कामांमुळे सातत्याने रस्त्यांचे खोदकाम चालू आहे. संतनगर, संतपेठ, विस्थापित नगर, अनिलनगर, घोंगडेगल्ली, गोविंदपुरा आणि महात्मा फुले नगर वसंत नगर प्रशांत परिचारक नगर या भागांतील रस्तेही खड्डयांनी पोखरले आहेत. तालुका पोलीस स्टेशन ते पुणे रोड दरम्यानचा सर्व्हिस रोड तर वाहनचालकांसाठी धोक्याचे ठिकाण ठरतो आहे. इतर भागांत खड्ड्यांचे साम्राज्य आहे. कामे सुरू झाल्यावर त्यांची पूर्णता किंवा रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे गांभीर्य कुठेच दिसत नाही.
बसस्थानकात ‘खड्डेमय’ स्वागत
पंढरपूर बस स्थानकाचा परिसर म्हणजे खड्ड्यांचे जाळे आहे. आत-बाहेर जाणाऱ्या प्रवेशद्वारांवर खड्डे, फुटलेल्या गटाराच्या लाद्या आणि चिखलाने भरलेला परिसर, हे सगळे प्रवाशांना दररोज झेलावे लागत आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या महत्त्वाच्या केंद्राची ही दुरवस्था पाहता, जबाबदार यंत्रणांची उदासीनता स्पष्ट होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
 नुसते डांबरीकरण नको, टिकाऊपणा हवा 
नागरिक आता केवळ रस्ते दुरुस्त होण्याची नाही, तर ते टिकाऊ असण्याची मागणी करू लागले आहेत. पावसाळ्यात वाहतुकीचा आणि सुरक्षिततेचा प्रश्न बिकट झाला आहे. यंत्रणांनी वेळेत, दर्जेदार आणि नियोजनबद्ध कामे केली नाहीत, तर या खड्ड्यांमधून नाराजी आणि संतापाच्या लाटा लवकरच उसळतील, हे निश्चित.
काही भागात अपघातांचा धोका 
लक्ष्मी टाकळी येथील नवीन रेल्वे पुलाचे सुरू असलेल्या कामामुळे लक्ष्मी टाकळी, कासेगांव, अनवली परिसरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. रात्रीच्या वेळी या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी मालवाहू वाहने रुतून बसत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रस्त्यांचे काम ऐन पावसाळा सुरू झाल्यावर हाती घेण्यात आले. त्याचे परिणाम डांबर वाहून गेले आहे. पावसाआधी चार महिने आधी हॉटमिक्सिंग झाले पाहिजे, अशी तज्ज्ञांची शिफारस असूनही ती दुर्लक्षित केली जाते.

Web Title: Pandharpur roads in bad condition potholes repair before ashadhi wari 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 12:11 PM

Topics:  

  • Ashadhi Wari
  • Pandharpur News
  • Vitthal Rukmini Mandir

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.