Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपतींच्या पुतळा दुर्घटनेत उपमुख्यमंत्री फडणवीस केव्हा माफी मागणार? परशुराम उपरकर यांचा सवाल

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधी माफी मागणार असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे. पालकमंत्र्यांचे सचिव अनिकेत पटवर्धन, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, अशी मागणी देखील उपरकर यांनी केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 02, 2024 | 02:14 PM
छत्रपतींच्या पुतळा दुर्घटनेत उपमुख्यमंत्री फडणवीस केव्हा माफी मागणार? परशुराम उपरकर यांचा सवाल

छत्रपतींच्या पुतळा दुर्घटनेत उपमुख्यमंत्री फडणवीस केव्हा माफी मागणार? परशुराम उपरकर यांचा सवाल

Follow Us
Close
Follow Us:

राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकारण प्रचंड तापलं आहे. राजकारणी नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन जनतेची माफी मागितली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी देखील जाहीर रित्या जनतेची माफी मागितली. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तर माफी मागितली पण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधी माफी मागणार, असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे.

हेदेखील वाचा- मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या व्यक्तिनं हाती घेतलं बसचं स्टीयरिंग; रस्त्यावर गोंधळ, 9 जण जखमी

परशुराम उपरकर म्हणाले की, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरणात अनेक राजकीय पक्षाचे नेते येवून गेले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जाहीर रित्या माफी मागीतली. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापही माफी मागीतली नाही. पेशवे शाहीच्या माध्यमातून हे सगळे चालू आहे. त्यामुळेच या प्रकरणात दोषी असलेले पालकमंत्री, कार्यकारी अभियंता, मुर्ती बनवणारा ठेकेदार जयदीप आपटे या व्यक्तींकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. पालकमंत्र्यांचे सचिव अनिकेत पटवर्धन, कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी. राजकोट लोकार्पनासाठी हॅलीपॅड बनवण्याची निविदा होण्याआधी कार्यारंभ आदेश कसा दिला?

कणकवली येथील कार्यालयात पत्रकारांशी बोलताना परशुराम उपरकर म्हणाले की, छत्रपतींच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या विषयावर बोलताना कपाळावर खुण दाखवण्यात आली. त्या खुणेबाबत कृष्णाजी कुलकर्णी हा अफजल खान यांचा वकील होता, अफजल खानाचा कोथळा काढला तेव्हा त्या वकिलाने महाराजांवर वार केला, ती खूण दाखवण्याचा प्रयत्न शिल्पकार जयदीप आपटे यांनी केला. मुळात जयदीप आपटेकडे कुठलीही डिग्री नाही. जे.जे. आर्टसमध्ये तो शिकलेला नाही. मग त्याला कोण पाठीशी घालत आहे? त्याला कोणी लपवले आहे?

हेदेखील वाचा- मोबोक्रसी निर्माण झाली आहे; सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा राजकीय नेत्यांना फटकारलं

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना झाल्यानंतर अजयकुमार सर्वगोड गायब झाले आहेत. त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई होण्याची गरज होती. बांधकामचे अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता यांनी संगनमताने हा घोळ केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्री, पालकमंत्री फक्त एकदाच येवून गेले ही खरी शोकांतिका आहे. कार्यक्रम होण्यापूर्वी पालकमंत्री पुढे पुढे नाचत होते, ते कुठे आहेत? पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. कार्यकारी अभियंत्याचे निलंबन करावे. पालकमंत्र्यांचा सचिव अनिकेत पटवर्धन याने हे सगळं केलं आहे. त्याची चौकशी झाली आहे. या घटनेत एकाबाजूने माफी मागायची दुसरीकडे कुठलीही कारवाई नाही. ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याची टीका परशुराम उपरकर यांनी केली आहे.

उपरकर यांनी म्हटलं आहे की, नव्याने पुतळा उभारण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची गरज होती. आता शासन जागे होवून वयस्कर असलले धुळ्यातील शिल्पकार सुतार यांना आणून त्यांना पुतळा उभारण्याचं काम दिले जात आहे. ते जागतिक कीर्तीचे असल्याने ते वर्षभर तरी पुतळा उभारण्यासाठी वेळ घेतील. कणकवली सार्वजनिक विभागामार्फत राजकोट येथील छत्रपतींच्या पुतळा लोकार्पन व नौदल दिनाच्या निमित्ताने व्हीआयपी व्यक्तींसाठी तयार करण्यात आलेल्या हॅलीपॅडची निविदा व अनामत रक्कम घेण्याच्या तारखांमध्ये फरक आहे.

काम करण्यासाठी वर्क ऑर्डर संबंधित ठेकेदाराला निविदा प्रक्रिया पुर्ण होण्या अगोदरच देण्यात आली. हा बांधकाम विभागाचा अजब कारभार आहे. तसेच निविदेच्या 33 टक्क्यांच्या प्रमाणात कामांचे वाटप करताना जी कामे मजुर संस्थांना द्यावयाची होती. त्या कामांबाबत जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांना पत्रव्यवहार न करताच बांधकाम विभागाने 50 लाखांच टेंडर देण्याच काम केल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.

Web Title: Parashuram uparkar asks when devendra fadnavis will apology for chhatrapati shivaji maharaj statue collapse issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 02:11 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Asha Bhosle : सुरांची सुंदर बाग आज उजाड…! CM देवेंद्र फडणवीसांनी आशाताईंच्या निधनावर व्यक्त केला शोक
1

Asha Bhosle : सुरांची सुंदर बाग आज उजाड…! CM देवेंद्र फडणवीसांनी आशाताईंच्या निधनावर व्यक्त केला शोक

खानवडीत ‘ज्योती-सावित्री’ शाळेचे उद्घाटन; महिलांच्या ३३% आरक्षण निर्णयाला फुले विचारांची जोड
2

खानवडीत ‘ज्योती-सावित्री’ शाळेचे उद्घाटन; महिलांच्या ३३% आरक्षण निर्णयाला फुले विचारांची जोड

Baramati by-electionची रणधुमाळी सुरु असताना सुनेत्रा पवार वर्षा बंगल्यावर; फडणवीसांनी दिला शब्द
3

Baramati by-electionची रणधुमाळी सुरु असताना सुनेत्रा पवार वर्षा बंगल्यावर; फडणवीसांनी दिला शब्द

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! वाहतूक कोंडीतून होणार सुटका;’मेट्रो 9 आणि 2बी’मार्गिकेचे उद्घाटन, थेट अंधेरी ते मिरा-भाईंदर प्रवास
4

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! वाहतूक कोंडीतून होणार सुटका;’मेट्रो 9 आणि 2बी’मार्गिकेचे उद्घाटन, थेट अंधेरी ते मिरा-भाईंदर प्रवास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.