Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमरावतीत राजकारण तापलं; पोलीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बाचाबाची

अनिल बोंडे म्हणाले, “ संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची भाषा  करणे योग्य नाही. परंतु, राहुल गांधी आरक्षणाबाबत जे बोलले, तेही भयानक आहे. परदेशात जाऊन कोणी  काहीही बोलत असेल, तर जीभ त्याच्या जीभेला चटके दिले पाहिजेत.  मग ते राहुल गांधी असोत, ज्ञानेश महाराव असोत वा श्याम मानव असोत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 18, 2024 | 03:10 PM
अमरावतीत राजकारण तापलं; पोलीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बाचाबाची
Follow Us
Close
Follow Us:

अमरावती:  भाजप खासदार अनिल बोंडे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अमरावतीत  राजकारण चांगेलच तापले आहे.  काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर, काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे,माजी मंत्री सुनील देशमुख  यांच्यासह  काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी अमरावती पोलीस आयुक्तालयात पोहचले आणि  अनिल बोंडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद होईपर्यंत हलणार नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे पोलीस आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.  याप्रकरणात यशोमती ठाकूर  चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.

यशोमती ठाकूर  आक्रमक

यशोमती ठाकूर म्हणाल्या, ‘एक मुर्ख माणूस आहे. त्याला अमरावतीत आणि महाराष्ट्रात दंगल करायची आहे. त्यासाठीच ते असं  काही ना काही करत असतात. काल मुख्यमंत्र्यांचा माणूस बोलला. आज आमच्या गृहमंत्र्यांचा माणूस बोलत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना त्यांचे चमचे संभाळता येत नाहीयेत. ते जर अमरावतीत अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असतील तर ते आम्ही होऊ देणार नाही. हे सर्व पोलीस अधिकारी आज जा उद्या बदल्या झाल्या की निघून जातील पण आम्ही इथेच मरणार आहोत. आम्ही हे सहन करू शकत नाही. आमच्या नेत्याविरोधात कोणी काही बोलत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही.  जो पर्यंत अनिल बोंडेंवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. असेही यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: ‘आम्ही आगामी निवडणूक स्वतःसाठी नव्हे तर…’; आदित्य ठाकरे यांचं विधान

यावेळी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, “एक वायफळ माणसाला भाजपने खासदार केलं आहे. या राज्य सभेच्या खासदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. राहुल गांधी आमचे नेते आहे. या महाराष्ट्रात नेहमी सलोखा राहिला आहे. पण गेल्या चार वर्षांपासून अनिल बोंडेंच्या  डोक्यात फरक पडला असल्याने इथे जातीय दंगल कशी भडकेल यासाठी ते काम करत असतात. देवेंद्र फडणवीस त्यांना असे करायला लावतात, असा आमचा संशय आहे. त्या सर्वांवर गुन्हे दाखल झाला पाहिजे. असं जर कोणी पंतपधानांबदद्ल असं कोणी बोललं असत, तर पोलिसांनी एवढा वेल लावला असता का, असा आमचा प्रश्न आहे.

आज आम्ही मुली  महिला इथे बसणार आहोत. जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत आम्ही इथे बसणार आहोत.  किती दिवस लावले असते. संबंधितावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असा  आणि त्याला तात्काळ अटक केली. त्यांच्यावर आधी गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलीस यंत्रणा भ्रष्ट झाली का, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणसीस यांची फेर नॅरेटिव्ह ची भाषा करतात.  आख्खा महाराष्ट्र त्यांनी खराब करून टाकला असल्याची त्यांनी टीकाही केली.

काय म्हणाले संजय गायकवाड ?

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत संविधान धोक्यात आहे, असा फेक नरेटिव्ह सेट करून राहुल गांधी आणि काँग्रेसने मते घेतली. पण  आज ते आरक्षण संपविण्याची भाषा करायला लागेलत. 100 टक्के काँग्रेसला मागासवर्गीय, ओबीसी आणि आदिवासींचं आरक्षण संपवायचं आहे. पण असं वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देईल,” असं विधान संजय गायकवाड यांनी केलं होतं.

हेही वाचा: संजय गायकवाडांनंतर भाजप खासदार बरळला; राहुल गांधींची जीभ…

काय म्हणाले अनिल बोंडे?

अनिल बोंडे म्हणाले, “ संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची भाषा  करणे योग्य नाही. परंतु, राहुल गांधी आरक्षणाबाबत जे बोलले, तेही भयानक आहे. परदेशात जाऊन कोणी  काहीही बोलत असेल, तर जीभ त्याच्या जीभेला चटके दिले पाहिजेत.  मग ते राहुल गांधी असोत, ज्ञानेश महाराव असोत वा श्याम मानव असोत. जे भारतातील बहुसंख्याक नागरिकांच्या भावना दुखावतात. त्यांना किमान जाणीव तरी करून दिली पाहिजे, असं अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.

Web Title: Politics heated up in amravati as police and congress leaders clashed nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 03:10 PM

Topics:  

  • Congress
  • Yashomati Thakur

संबंधित बातम्या

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
1

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
2

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
3

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा
4

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.