Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहेत. यावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारकडे शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 03, 2025 | 12:27 PM
पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

Follow Us
Close
Follow Us:

यवत : गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी आणि वादळामुळे मराठवाड्यासह विविध भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला असून बळीराजावर संकट कोसळलं आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहेत. यावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारकडे शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, राज्य सरकारने तातडीने “ओला दुष्काळ” जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या संदर्भात आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी निवेदन दिले असून, त्यात म्हटले आहे की अतिवृष्टीमुळे पिके, शेती, घरे, गोठे, जनावरे व अन्न, धान्य यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला असून, या अस्मानी संकटकाळात सरकारने तातडीने मदतीचा हात द्यावा.

मोठ्या उद्योगपतींना कोणत्याही अटी-शर्तीशिवाय कर्जमाफी व मदत दिली जाते, मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत पंचनामे, सर्व्हे अशा अटी लादल्या जातात, असा सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, आज शेतकऱ्यांना केवळ घोषणांची नव्हे तर ठोस आर्थिक मदतीची गरज आहे. सरकारने जाहीर केलेली २२०० कोटींची मदत ही तुटपुंजी असल्याचे सांगत आंबेडकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून वसूल होणाऱ्या कोटींच्या सेसचा उपयोग शेतकऱ्यांच्या मदतीसाठी का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

हे सुद्धा वाचा : पूरग्रस्तांसाठी सरकारची शेतकऱ्यांकडूनच वसुली! प्रति टन उसामागे होणार ‘इतक्या’ रुपयांची कपात

वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख मागण्या काय आहेत?

  • राज्यात तातडीने “ओला दुष्काळ” जाहीर करावा.
  • शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत द्यावी.
  • शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.
  • शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट ५० हजार मदत वर्ग करावी.
  • उद्योगपतींना दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांनाही विना अट मदत द्यावी.

Web Title: Prakash ambedkar has demanded that the government help farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 12:27 PM

Topics:  

  • Adv Prakash Ambedkar
  • Ajit Pawar NCP
  • CM Devedra Fadnavis
  • Farmers

संबंधित बातम्या

अवकाळी पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल; दिलीप वळसे पाटलांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
1

अवकाळी पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल; दिलीप वळसे पाटलांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

खेडच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार, चिखलगाव परिसरात पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनाम्यांची मागणी
2

खेडच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार, चिखलगाव परिसरात पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनाम्यांची मागणी

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?
3

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?

दहा दिवसांत आम्हाला घराचा ताबा मिळावा, नाहीतर आम्ही…; पुण्यात बिल्डरविरोधात सदनिकाधारकांचा संताप
4

दहा दिवसांत आम्हाला घराचा ताबा मिळावा, नाहीतर आम्ही…; पुण्यात बिल्डरविरोधात सदनिकाधारकांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.