Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune RTO News: परवाने देताना आरटीओ प्रशासन झोपले होते का?

नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून राज्य परिवहन विभागाकडून रिक्षाला परवाना दिला जातो. गरज नसताना गरजेपेक्षा जास्त परवाने अधिकारी आणि काही एजंट मंडळीनी मिळून वाटप केले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 14, 2025 | 08:33 AM
Pune RTO News: परवाने देताना आरटीओ प्रशासन झोपले होते का?
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी: महाराष्ट्र राज्यातील रिक्षा चालकांसाठी नवीन रिक्षा परवाना (परमिट) आरटीओ प्रशासनाकडून २०१७ पासून सुरुवात करण्यात आली. यानंतर काही कालावधीनंतर रिक्षा चालकांनी खुले परमिट बंद करण्याची मागणी वारंवार केली. मात्र ती न करता आजपर्यंत ही खुले परमिट सुरूच आहेत. यामुळे ज्यांना गरज नाही अशांनीही रिक्षा घेतली. जे सरकारी, निमसरकारी, खाजगी आस्थापनात काम करतात अशांचे परमिट ३० एप्रिलपर्यंत परत करण्याचे आवाहन आरटीओने केले आहे. मात्र परवाने देतानाच आरटीओ प्रशासनाने याची खात्री करणे अपेक्षित होते. त्यामुळे हजारों परवाने वाटप करताना त्यांच्या लक्षात का आले नाही? आरटीओ प्रशासन झोपले होते का? असा सवाल कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी उपस्थित केला आहे.

कष्टकरी संघर्ष रिक्षा महासंघ व सारथी चालक-मालक महासंघातर्फे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, विविध शहरात असंख्य नागरिक व खाजगी वाहनांचा वापर करत असतात आणि नागरिकांच्या सोयीसाठी अत्यंत जवळ व सहज उपलब्ध होणारे वाहन म्हणून रिक्षाकडे आपण पाहतो. नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून राज्य परिवहन विभागाकडून रिक्षाला परवाना दिला जातो. गरज नसताना गरजेपेक्षा जास्त परवाने अधिकारी आणि काही एजंट मंडळीनी मिळून वाटप केले. लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात रिक्षा देणे अपेक्षित असताना त्याच्या कितीतरी टप्पा पुढे गेला तरी रिक्षा परवाने वाटप सुरूच आहे. त्यामुळे प्रामाणिक आणि ज्यांची उपजीविका केवळ रिक्षावरच आहे अशा रिक्षा चालकावर अन्याय झाला असून गरज नाही तेही रिक्षा चालवत आहेत.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या दरात घसरण, चांदीच्या किमती नरमल्या; 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव वाचा

किती परवाने परत जमा होणार हा मोठा प्रश्न ?
आरटीओ प्रशासनाने यापूर्वीही नोकरी करणाऱ्यांनी परमिट जमा करावे असे आवाहन केले मात्र असे कोणी परत करत नसते, त्यामुळे आता ३० एप्रिल पर्यंत परत मागणी करून आरटीओ • प्रशासन केवळ त्यांचा बचाव करत आहे का असा सवाल उपस्थित होतो. त्याची पडताळणी न करता दिलेल्या परमिटची चौकशी करून अशा अधिकारी, कर्मचाऱ्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. त्यामुळे आरटीओ प्रशासनाने येथून पुढे तरी नीट काम करावे

परवाने देतानाच पूर्ण खात्री का केली नाही ?

आस्थापनात काम करतात ते सकाळी फर्स्ट शिफ्टला कामावर जाताना, येताना व सेकंड शिफ्टला कामावर जाताना आणि येताना कामावरून सुटल्यानंतर व्यवसाय करणारे अनेक आहेत. मर्यादेपेक्षा रिक्षाची संख्या वाढल्यामुळे रिक्षा चालकावर अन्याय झालेला असून त्यांचा रोजगार कमी झालेला आहे. आरटीओ प्रशासन जी महत्वाची कामे आहे त्याकडे दुर्लक्ष करून भलत्याच कामाकडे अधिक लक्ष देत असल्याचे निदर्शनास येत आहे. सरकारी किंवा खाजगी कंपनीत नोकरी करत नसल्याची अट असल्याने तसे प्रतिज्ञापत्र घेण्यात येत असते मात्र त्याचवेळी जर पूर्ण खात्री, पडताळणी केली असती तर अशा प्रकारची नामुष्की आरटीओ प्रशासनावर आलीच नसती.

Web Title: Pune rto news was the rto administration asleep while issuing licenses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2025 | 08:33 AM

Topics:  

  • pune news
  • RTO
  • RTO Office

संबंधित बातम्या

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?
1

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
2

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत
3

Maharashtra Rain Alert : मंत्रिमंडळ बैठक होणार..दोन दिवसांत पंचनामे करणार; पुण्याच्या पाऊस परिस्थितीवर अजित पवारांनी मांडले मत

पीडित तरुणींवरच गुन्हा दाखल : पुणे पोलिसांचे जंगलराज सुरु आहे का? सपकाळांचा संतप्त सवाल
4

पीडित तरुणींवरच गुन्हा दाखल : पुणे पोलिसांचे जंगलराज सुरु आहे का? सपकाळांचा संतप्त सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.