Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

युवकांना झुरळ म्हणणे म्हणजे युवाशक्तीचा अपमान, गैरसमज पसरवत ‘कॉक्रोच पार्टी’वर बंदी; विश्वजीत कदम यांचा आरोप

युवकांसारख्या समाजातील महत्त्वाच्या घटकाला झुरळ म्हणणे युवाशक्तीचा अपमान आहे, असा आरोप माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 23, 2026 | 06:42 PM
युवकांना झुरळ म्हणणे म्हणजे युवाशक्तीचा अपमान, गैरसमज पसरवत ‘कॉक्रोच पार्टी’वर बंदी; विश्वजीत कदम यांचा आरोप

युवकांना झुरळ म्हणणे म्हणजे युवाशक्तीचा अपमान, गैरसमज पसरवत ‘कॉक्रोच पार्टी’वर बंदी; विश्वजीत कदम यांचा आरोप

Follow Us
Follow Us:

पुणे : युवकांसारख्या समाजातील महत्त्वाच्या घटकाला झुरळ म्हणणे युवाशक्तीचा अपमान आहे. वाढत्या बेरोजगारीसह त्यांच्या अन्य समस्यांवर मीठ चोळले जात आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ ला मिळणारा मोठा प्रतिसाद पाहून ते देशाबाहेरचे आहेत, असा गैरसमज पसरवत त्यांच्यावर बंदी आणली गेली,’ असा आरोप माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी केला आहे. कॉक्रोच जनता पार्टी ही तूर्त समाज माध्यमांवरून चालणारी चळवळ आहे,’ असेही कदम म्हणाले.

 

पुणे शहर आणि जिल्ह्यासह राज्यात गुन्हेगारी घटना वाढत आहे. महिलांवरील अत्याचार थांबत नाहीत. लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. याला गृहमंत्री असलेले मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे ही त्यांची जबाबदारी आहे. किती गुन्हे जलदगती न्यायालयात चालवले गेले, किती गुन्ह्यांबाबत जलदगती न्यायालयाची फक्त घोषणाच झाली, त्यातील किती घटनांमध्ये अद्याप न्याय मिळालेला नाही, हे सर्वांसमोर आहे. त्यामुळे राज्य सरकार झोपले आहे की जागे आहे, हेच समजत नाही, अशी टीकाही डॉ. कदम यांनी पत्रकार परिषदेत केली .

राज्यात विविध समस्यांचे डोंगर उभे आहेत. महागाई, रस्त्यांची दुरावस्था, पाणीटंचाई, बेरोजगारी, कंत्राटदारांची थकलेली देणी, शेतकऱ्यांच्या समस्या याकडे दुर्लक्ष करत राज्य सरकार केवळ राजकारणच करत आहे, असेही कदम म्हणाले. ‘आखाती देशांमधील युद्धस्थितीमुळे पेट्रोल डिझेलवर परिणाम होणार आहे, याची सरकारला कल्पना होती. मात्र, त्याकडे लक्ष न देता भाजपचे केंद्र सरकार केवळ पाच राज्यातील निवडणुकांमध्येच मग्न होते. मधील काळात कोणत्याही उपाययोजना न करताच या सरकारने निवडणुकांचे मतदान झाल्याच्या ४८ तासातच इंधनाचे दर वाढवले. त्यामुळे आधीच महागाईने होरपळलेल्या जनतेच्या अडचणीत भरच पडली आहे, असेही कदम म्हणाले.

युवकांचा काँग्रेसलाच पाठिंबा आहे. काँग्रेस ही समाज माध्यमांवरून नव्हे तर रस्त्यावर उतरून काम करणारी संंघटना आहे. काँग्रेसने कायमच संपूर्ण समाजाच्या विविध प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा दिला आहे. सभागृहात जनतेचे प्रश्न मांडले आहेत. त्यामुळे युवकही काँग्रेससोबतच आहेत. सध्या जिथे काँग्रेसची स्वत:ची सत्ता आहे, तिथे तसेच जिथे काँग्रेस मित्रपक्षांसह सत्तेत आहे, तिथे काँग्रेसने ४५ वर्षांच्या आतील युवा पदाधिकाऱ्यांनाच कॅबिनेट मंत्रीपद दिले आहे. कॉक्रोच जनता पार्टी ही तूर्त समाजमाध्यमांवरून चालणारी चळवळ आहे,’ असेही कदम म्हणाले.

हे सुद्धा वाचा : पुणेकरांसाठी खुशखबर! आता मेट्रोची तिकिटे मिळणार ‘या’ App वर; रांगेत उभा राहण्याची कटकट मिटली

नीट पेपरफुटी ही केंद्राचीच जबाबदारी

‘नीट’या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरफुटीला केंद्र सरकारच जबाबदार आहे. ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’च्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नीटचे पेपर फुटल्याने लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. यासाठी जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई झाली पाहिजे. तसेच यापुढे कोणताही पेपर फुटणार नाही, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे, असे डॉ. विश्वजित कदम म्हणाले.

Web Title: Congress leader vishwajit kadam has reacted to the cockroach janata party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 06:42 PM

Topics:  

  • Cockroach Janta Party
  • Dr. Vishwajeet Kadam
  • pune news

संबंधित बातम्या

पाऊले चालती पंढरीची वाट…! संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात भक्तिभावात स्वागत
1

पाऊले चालती पंढरीची वाट…! संत ज्ञानेश्वर आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे पुण्यात भक्तिभावात स्वागत

दुध भेसळीच्या हॉटस्पॉटवर मुंढेंचा दुसरा सर्जिकल स्ट्राईक; १.३४ कोटींची संशयित पावडर जप्त, मंचरनंतर थेट अकलूजवर धाड
2

दुध भेसळीच्या हॉटस्पॉटवर मुंढेंचा दुसरा सर्जिकल स्ट्राईक; १.३४ कोटींची संशयित पावडर जप्त, मंचरनंतर थेट अकलूजवर धाड

Maharashtra Breaking News Updates Today: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार टाकणार मोठा डाव?
3

Maharashtra Breaking News Updates Today: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार टाकणार मोठा डाव?

‘लालपरी’ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल ‘इतक्या’ लाखोंचे नुकसान
4

‘लालपरी’ला पावसाचा फटका; पुणे एसटी प्रशासनाला दररोज भोगावे लागतेय तब्बल ‘इतक्या’ लाखोंचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.