Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांद्याने पुन्हा केला वांदा! शेतकऱ्यांची चिंता वाढली; सध्या किती आहे दर?

पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात विक्रमी कांद्याचे उत्पादन झाले असून शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 22, 2025 | 02:27 PM
कांद्याने पुन्हा केला वांदा! शेतकऱ्यांची चिंता वाढली; सध्या किती आहे दर?

कांद्याने पुन्हा केला वांदा! शेतकऱ्यांची चिंता वाढली; सध्या किती आहे दर?

Follow Us
Close
Follow Us:

महाळुंगे पडवळ : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात विक्रमी कांद्याचे उत्पादन झाले असून शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. बाजारभाव कोसळल्याने उत्पादन खर्चसुद्धा वसूल होत नाही. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने प्रति दहा किलो २०० रुपये दराने कांदा खरेदी करावा, अशी ठाम मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

बाबाजी चासकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साधारणपणे ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात कांद्याला वाढीव दर मिळतो. मात्र यंदा परिस्थिती उलट झाली. मे-जूनमध्ये कांद्याला १८० ते २०० रुपये दर मिळाला. ऑगस्टमध्ये तो १०० ते १५० रुपयांवर घसरला. तर सप्टेंबरमध्ये शंभर रुपयांच्या आत भाव आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

बाजारभावात उत्पादन खर्चही भरून निघेणा

कांद्याचा उत्पादन खर्च एकरी तब्बल एक लाख रुपयांपर्यंत येतो. एकरी सरासरी १८० गोण्या उत्पादन मिळते. परंतु सध्याच्या बाजारभावात उत्पादन खर्चही भरून निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्यात धोरणातील अनिश्चिततेमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. साकोरेचे सरपंच अनिल गाडे यांनी सांगितले की, वातावरणातील बदलांमुळे बराकीत कांद्याला वास येत आहे. कांद्याची निवड करताना मोठ्या प्रमाणात चौरे फुटत आहेत आणि दुय्यम दर्जाचा कांदा तयार होत आहे. बाजारात हा कांदा नेला तर त्याला केवळ ३ रुपये किलो भाव मिळतो.

हे सुद्धा वाचा : …मग गेली आठ वर्ष लूट महोत्सव सुरु होता का? काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका

शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी

कांदा आडतदार सागर थोरात म्हणाले, “सध्या कांद्याला मागणीच नाही. बाहेरील राज्यांत कांदा जात नाही. निर्यातीबाबत सरकारकडून कोणतेही स्पष्ट धोरण नाही. मोठ्या शहरांपुरतेच विक्रीचे प्रमाण मर्यादित असून अपेक्षित दर मिळत नाहीत.”शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की, “शेतकऱ्यांचा जीव वाचवायचा असेल तर शासनाने तातडीने बाजार हस्तक्षेप योजना राबवून दहा किलोला २०० रुपये दराने कांदा खरेदी करावा.”स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, याचा फटका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी पक्षाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Farmers are in trouble as they are not getting good prices for onions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2025 | 02:27 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Onion News
  • Onion Rate

संबंधित बातम्या

“महाराष्ट्रात मराठीच सक्तीची…”; साहित्यरसिकांनी CM फडणवीसांकडे केली महत्वाची मागणी
1

“महाराष्ट्रात मराठीच सक्तीची…”; साहित्यरसिकांनी CM फडणवीसांकडे केली महत्वाची मागणी

९९ व्या Akhil Bhartiya Sammelan चे उद्घाटन, सातारामध्ये भरला साहित्यिकांचा मेळा
2

९९ व्या Akhil Bhartiya Sammelan चे उद्घाटन, सातारामध्ये भरला साहित्यिकांचा मेळा

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना
3

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात
4

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.