Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे, इंदापूर, बारामतीसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा; 20.62 टीएमसी पाणी उपलब्ध

सुमारे २०.६२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये विशेषतः वीर धरणाचा साठा सर्वाधिक महत्त्वाचा मानला जात असून, सध्या धरणात ५२२५ दशलक्ष घनफूट म्हणजे सुमारे ५.६८ टीएमसी पाणी उपलब्ध आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 27, 2026 | 02:55 PM
पुणे, इंदापूर, बारामतीसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा; (Photo Credit- X)

पुणे, इंदापूर, बारामतीसह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा; (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

नीरा : राज्यात अनेक भागांत पाण्याची टंचाई जाणवत आहे. असे असताना निरा नदी प्रणालीतील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्यामुळे पुणे, बारामती, इंदापूर, पुरंदर आणि फलटण परिसराला मोठा दिलासा मिळाला आहे. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण निरा नदी प्रणालीत सध्या सुमारे २०.६२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये विशेषतः वीर धरणाचा साठा सर्वाधिक महत्त्वाचा मानला जात असून, सध्या धरणात ५२२५ दशलक्ष घनफूट म्हणजे सुमारे ५.६८ टीएमसी पाणी उपलब्ध आहे.

निरा नदी खोऱ्यातील प्रमुख धरणांमध्ये भाटघर, देवघर, गुंजवणी आणि वीर धरणांचा समावेश होतो. यापैकी वीर धरणाची एकूण क्षमता ९८३५ दशलक्ष घनफूट असून, त्यातील उपलब्ध साठा उन्हाळ्याच्या अखेरीसही समाधानकारक मानला जात आहे. अहवालानुसार, वीर धरणातील पाणीसाठा सध्या सुमारे ५१ टक्क्यांच्या आसपास आहे. मागील वर्षी म्हणजे २६ मे २०२५ रोजी वीर धरणात सुमारे ३३७५ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. तर यंदा हा साठा वाढून ५२२५ दशलक्ष घनफूट इतका झाला आहे. म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वीर धरणात सुमारे १८५० दशलक्ष घनफूट अधिक पाणी उपलब्ध आहे. टक्केवारीत पाहिले तर यंदाची स्थिती लक्षणीयरीत्या सुधारलेली दिसत आहे.

पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे पूर्ण करा ! जिल्हाधिकारी यांचे यंत्रणेला कडक निर्देश; जलयुक्त शिवार २.० चा आढावा

यामुळे आगामी काही आठवडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता कमी मानली जात आहे. विशेषतः बारामती, इंदापूर आणि पुरंदर तालुक्यांतील शेती व नागरी पाणीपुरवठ्यासाठी वीर धरण महत्त्वाचा आधार मानला जातो.

सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापर

अहवालानुसार, यंदाच्या रब्बी आणि उन्हाळी हंगामात निरा डावा व उजवा कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या आवर्तनानुसार निरा प्रणालीतील दोन्ही कालव्यांतून सिंचनासाठी पाणीपुरवठा सुरू आहे. निरा डावा कालव्याद्वारे विविध टप्प्यांमध्ये पाणी सोडण्यात आले असून, १५ ऑक्टोबर २०२५ पासून आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे निरा उजवा कालव्याद्वारेही रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे.

निरा डावा कालवा ; सुमारे ८२७ क्युसेक विसर्ग

सुमारे १५५० क्युसेक विसर्ग सध्या सुरू आहे. वीर धरणातून सोडण्यात येणारे पाणी बारामती, इंदापूर, माळशिरस, पुरंदर, फलटणसह अनेक भागातील शेतीसाठी जीवनरेखा मानले जाते. ऊस, डाळिंब, भाजीपाला आणि इतर पिकांसाठी सध्या सिंचन सुरू असल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.

Web Title: Major relief for residents of pune indapur baramati and the surrounding areas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Water Issue

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानच्या पाणीपुरवठ्यावर संकट? शार्लोट लेक २०१३ पासून गाळमुक्तच नाही, मनसे आक्रमक
1

Matheran News: माथेरानच्या पाणीपुरवठ्यावर संकट? शार्लोट लेक २०१३ पासून गाळमुक्तच नाही, मनसे आक्रमक

ओतूर परिसरात विहिरींनी गाठला तळ; उन्हाळ्यामुळे भीषण पाणीटंचाई, टोमॅटो-मिरची पिके संकटात
2

ओतूर परिसरात विहिरींनी गाठला तळ; उन्हाळ्यामुळे भीषण पाणीटंचाई, टोमॅटो-मिरची पिके संकटात

पुणे जिल्ह्यात तीव्र ‘पाणीबाणी’, सव्वा लाखांहून अधिक नागरिक टँकरच्या भरवशावर; ‘हा’ तालुका सर्वाधिक टंचाईग्रस्त
3

पुणे जिल्ह्यात तीव्र ‘पाणीबाणी’, सव्वा लाखांहून अधिक नागरिक टँकरच्या भरवशावर; ‘हा’ तालुका सर्वाधिक टंचाईग्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.