Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi : ‘PM मोदींनी राज्यघटना वाचली असती तर…’; राहुल गांधीचा गोंदियाच्या सभेतून हल्लाबोल

भाजपचे लोक २४ तास राज्यघटना बदलण्याची भाषा करतात. नरेंद्र मोदींनी राज्यघटना कधी वाचलीच नाही. जर वाचली असती तर संविधान बदलण्याची भाषा कधीही केली नसली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 12, 2024 | 06:07 PM
'PM मोदींनी राज्यघटना वाचली असती तर...'; राहुल गांधीचा गोंदियाच्या सभेतून हल्लाबोल

'PM मोदींनी राज्यघटना वाचली असती तर...'; राहुल गांधीचा गोंदियाच्या सभेतून हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

राज्यघटनेत कुठेही लिहिलेलं नाही की, गरिबांना न्याय मिळू नये, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळून नये. कुठेही म्हटलेलं नाही की, रोजगार देऊ नये. मात्र भाजपचे लोक २४ तास राज्यघटना बदलण्याची भाषा करतात. नरेंद्र मोदींनी राज्यघटना कधी वाचलीच नाही. जर वाचली असती तर संविधान बदलण्याची भाषा कधीही केली नसली, असा आरोप राहुल गांधी यांनी गोंदियातील सभेतून केला.

हेही वाचा–Crime News: पुण्याच्या हडपसरमध्ये बंद फ्लॅट फोडून तब्बल ‘इतके’ लाख लुटले; पोलिसांचा तपास सुरू

नरेंद्र मोदी सरकारने तीन काळे कायदे आणले. या कायद्यांविरोधात शेतकरी रस्यावर उतरले. तरीही नरेंद्र मोदी म्हणत आहेत की, मी शेतकऱ्यांसाठी कायदे आणले. नरेंद्र मोदींनी किती शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलं? मोदींनी दहा वर्षांत शेतकऱ्यांसाठी काय केलं? याचा जाब विचारला पाहिजे.

शेतकरी, गरिबांसाठी. तरुणांसाठी काहीही केलंलं नाही, तरीही उद्योगपतींचं कर्ज माफ केलं जातं आहे. धारावीची जमीन अदानींच्या घशात घालण्यात आली. टीव्हीवर अंबानी कुटुंबीयांच लग्न दिसलं. पण शेतकऱ्यांचा फोटो दिसला नाही. मोदी लग्नाला गेले होते. मी गेलो नाही. कारण ते त्यांचे आहेत. मी सर्वांचा आहे. ही जनता माझी आहे.

भारतात मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणात आहे. पण नेमकी संख्या कोणालाही माहिती नाही. भारतात अंदाजे ५० टक्के ओबीसी आहेत. मात्र नरेंद्र मोदी २४ तास स्वत:ला ओबीसी असल्याचे सांगत असतात. देशात सर्वात जास्त जीएसटी गरीब लोक देतात. अदानी अंबानी जितका टॅक्स देतात. तितकाच टॅक्स देशातील सर्वसामान्य जनता देते. महाराष्ट्रातही आरक्षणासाठी आंदोलनं होतायेत. तरीही त्यांची दखल घेतली जात नाही.

हेही वाचा–Odisha Government: ओडिशा सरकारने वक्फ दुरुस्ती विधेयकावर विचार करण्यासाठी मागितला वेळ

जीएसटीचा पैसा केंद्र सरकारकडे जातो. प्रत्येक वर्षी अर्थमंत्री बजेट सादर करतात. बजेटमध्ये आपल्या टॅक्सचा साठा वाटला जातो. अर्थमंत्री बजेट सादर करतात, त्यासाठी ९० प्रशासकीय अधिकारी निर्णय घेतात. हा निर्णय घेणाऱ्या लोकांमध्ये ३ ओबीसी अधिकारी आहेत. ओबीसी अधिकारी फक्त ५ टक्क्यांचा निर्णय घेतात. दलित, आदिवासी अधिकारी तर कुठे दिसत नाहीत, इतकी संख्या कमी आहे. हा खरा अपमान आहे. त्यामुळे काँग्रेस लोकसभेत काही महत्त्वाचं काम करणार आहे. त्यात जातनिहाय जनगणना पहिलं काम असेल, असं आश्वासन राहुल गांधी यांनी आज दिलं.

देशात ५० टक्के आरक्षणाची मर्यादा आहे. मात्र आता ती मर्यादा ओलांडली पाहिजे, कारण आम्हाला करोडपतींचा देश नको आहे. तर शेतकरी, तरुणांचा देश हवा आहे. त्यामुळे ही मर्यादा ओलांडून जातनिहाय जनगनणा करण्याचा कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीचा मानस आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेच्या सहकार्याची गरज असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

 

Web Title: Rahul gandhi criticizes pm narendra modi on reservation farmers and inequality maharashtra assembly election 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 05:56 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

राहुल गांधी बनले राम; कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमा देऊन केला सन्मान की अपमान?
1

राहुल गांधी बनले राम; कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमा देऊन केला सन्मान की अपमान?

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?
2

मामा राहिला बाजूला अन् भाच्याने उरकले लग्न: राहुल गांधी आले सलमानच्या रांगेत?

Karnatak News: EVMवर जनतेचा प्रचंड विश्वास; कर्नाटक काँग्रेस सरकारच्या सर्वेक्षणातून निष्कर्ष, भाजपचा राहुल गांधींवर हल्लाबोल
3

Karnatak News: EVMवर जनतेचा प्रचंड विश्वास; कर्नाटक काँग्रेस सरकारच्या सर्वेक्षणातून निष्कर्ष, भाजपचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.