Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News: उल्हासनदीवर पुलाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष; पुलाच्या दुरावस्थेबाबत कधी सुटणार प्रश्न ?

प्रशासनाकडून वेळीच दखल घेतली गेली नाही, तर यंदाच्या पावसाळ्यात देखील नदीपरिसरात राहणाऱ्या गावकऱ्यांचे अनोनात हाल होतील अशी खंत ग्रामपंचायतीच्या वतीने व्यक्त केली जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 03, 2025 | 11:30 AM
उल्हासनदीवर पुलाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष; पुलाच्या दुरावस्थेबाबत कधी सुटणार प्रश्न ?

उल्हासनदीवर पुलाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष; पुलाच्या दुरावस्थेबाबत कधी सुटणार प्रश्न ?

Follow Us
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे : दर पावसाळ्यात पुलावरुन पाणी जात असल्याने रोजच्या या त्रासाला गावकरी कंटाळले आहेत. मागच्या वर्षी पुराच्या पाण्याने लोखंडी रेलिंग वाहून गेला तेव्हापासून उल्हास नदीवर बांधलेला पुल प्रशासनाकडून दुर्लक्षित राहिला आहे. प्रशासनाकडून वेळीच दखल घेतली गेली नाही, तर यंदाच्या पावसाळ्यात देखील नदीपरिसरात राहणाऱ्या गावकऱ्यांचे अनोनात हाल होतील,  अशी भिती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर बेंडसे आणि वावे या गावांना जोडणाऱ्या पुलावरून दर पावसाळ्यात पुराची पाणी जात असतं. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात पुलावरून पाणी गेल्यानंतर पुलावरील लोखंडी रेलिंग वाहून गेले आहेत.त्या लोखंडी रेलिंग बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.दरम्यान, बांधकाम विभाग बेडसे वावे पुलाला लोखंडी रेलिंग बसवून घेणार आहे कि नाही? असा प्रश्न स्थानिक उपस्थित करीत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वच्छतेला जोर! ८१ टन कचरा झाला गोळा

वावळोली ग्रामपंचायत बेंडसे आणि उमरोली ग्रामपंचायत मधील वावे या दोन गावांना जोडणारा पूल 2020मध्ये उल्हास नदीवर बांधण्यात आला. त्यापूर्वी या भागातील लोकांना एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी एकतर कर्जत येथून किंवा भिवपुरी चिंचवली येथून जावे लागत होते. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने वावे आणि बेंडसे या गावांना जोडणारा पूल बांधला त्यामुळे गावकऱ्यांना हा मार्ग सोयीस्कर आहे. मात्र नदीवरील या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात त्या पुलावरून महापुराची पाणी जाऊन स्थानिकांच्या घरात शिरत असल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सातत्याने होत आहे.यावर्षी त्या पुलाला लावण्यात आलेले लोखंडी रेलिंग तुटून गेले असून ते लोखंडी रेलिंग पुन्हा लावण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग मागील तीन महिन्यात करू शकले नाही.

Karjat News: राजनाला कालव्याचे पाणी सावळे गावाच्या शिवारात ; शेतकऱ्यांनी पाटबंधारे खात्याच्या तत्परतेबद्दल मानले आभार

बांधकाम खात्याला त्या पुलाचे लोखंडी रेलोइंग महापुराच्या पाण्याने वाहून गेले आहेत याची माहिती आहे की नाही यावर देखील प्रश्नचिन्ह आहे. याचे कारण म्हणजे स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार बेंडसे वावे या पुलाचे पावसाळयात महापुराच्या पाण्याने नुकसान झाले. या सगळ्याची माहिती घ्यायला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी आले नाहीत. पावसाळ्यात  पुलाच्या वाहून गेलेल्या लोखंडी रेलिंगबद्दल बांधकाम खात्याने कोणतीही कार्यवाही केली नाही. अशी स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.सार्वजनिक बांधकाम विभाग बेंडसे वावे पुलाची दुरुस्ती करणार आहे काय? असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

Web Title: Karjat news administrations neglect of bridge over ulhas river disturbance pool in karjat grampanchayat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 11:25 AM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • raigad

संबंधित बातम्या

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील
1

Raksha Bandhan Viral Video: फाटलेले कपडे लोकांच्या नजरेत वेडा, पण बहिणीने राखी बांधताच भावाने जे केलं, ते पाहून डोळे पाणावतील

Chandrapur News: चंद्रपूरवर पाणीटंचाईचे संकट? जलप्रकल्पांमध्ये केवळ 55.85% जलसाठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली
2

Chandrapur News: चंद्रपूरवर पाणीटंचाईचे संकट? जलप्रकल्पांमध्ये केवळ 55.85% जलसाठा, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Raigad News: रोहा तालुक्यातील तिसे गावावर दरडीचा धोका, संरक्षण भिंतीचे काम रखडले; ग्रामस्थांचा जीव टांगणीला
3

Raigad News: रोहा तालुक्यातील तिसे गावावर दरडीचा धोका, संरक्षण भिंतीचे काम रखडले; ग्रामस्थांचा जीव टांगणीला

मासे खाताय सावधान!!! बोबींल ताजे दिसावे म्हणून महिलेने जे काही केले ते पाहून पुन्हा मासे खाण्याची इच्छा राहणार नाही… Video Viral
4

मासे खाताय सावधान!!! बोबींल ताजे दिसावे म्हणून महिलेने जे काही केले ते पाहून पुन्हा मासे खाण्याची इच्छा राहणार नाही… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.