
कर्जत तालुक्यात होत असलेलला शिलार धरण 25 मे 2025 रोजी मंजूर झाला. हा धरण मंजूर झाल्यावर प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये विरोध करण्यासाठी स्थानिक पातळीवर असलेल्या ग्रामपंचायती यांनी ठराव मंजूर केले आहेत. कशेळे ग्रामपंचायत, मोग्रज ग्रामपंचायत, पाथरज ग्रामपंचायत, रजपे ग्रामपंचायत, जामरुक ग्रामपंचायत टेंबरे ग्रामपंचायत येथील सर्व समाज बांधवांनी एकत्र येत शिलार धरणाविरोधी ठराव मंजूर केला.मात्र तरी देखील शासन हे धरण व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहे.त्यामुळे आता शेतकऱ्यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे.त्यात खांदन येथे बैठक आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी बैठकीसाठी मोठ्या संख्येने शेतकरी एकवटले होते.
सभेचे आयोजन दिनेश रसाळ यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते आणि त्यावेळी कर्जत पंचायत समितीचे सदस्य अक्षय तिटकारे तसेच निलेश घोडविंदे,अनिल शेमटे,अशोक असवले,मनोज भोईर, प्रकाश घोडवींदे,छगन सावंत,हारेश आहीर,दशरथ पुंजारा,एकनाथ दरवडा, संतोष कदम, माधव मिणमिणे, वसंत रसाळ, हरिश्चंद्र निरगुडा ऋषि पुंजारा रविंद्र गोमारे , गणेश भगत , शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.प्रस्तावित धरण परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी भाग असल्याने आदिवासी शेतकऱ्यांनी धरण विरोधी बैठकीसाठी गर्दी केली होती.
सुरुवातीला शेतकरी दिनेश रसाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा विभागाला प्रस्तावित शिलार धरणाच्या विरोधातील पत्र दिले असल्याची माहिती दिली.शासन शेतकऱ्यांना न्याय दिल्यानंतरच धरणाचे का सुरू करणार असे जाहीर करीत असताना दुसरीकडे या धरणाचे काम दिले गेले आहे अशा महालक्ष्मी कंट्रक्शन कंपनीकडून शिलार धरणाच्या कामाला सुरुवात करण्याची घाई केली जात आहे. तरी देखील शेतकऱ्याची जी कुचेष्टा सुरू केली आहे ती थांबवा आणि आमचा जीव गेला तरी हा धरण होऊन देणार नाही असाही इशारा सरकारला स्थानिकांकडून दिला जात आहे.हे धरण हद्दपार करण्यासाठी रास्ता रोको आणि अधिकाऱ्यांना घेराव घातला जाईल आज त्यानंतर आमरण उपोषण केले जाईल असे जाहीर केले.शरीरामध्ये शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत या धरणाला टोकाचा विरोध केला जाईल असा निर्धार दिनेश रसाळ यांनी या सभेत केला.
प्रदूषण मुक्त कर्जत बिरुदावली संपुष्टात येणार
या धरणांमुळे पर्यावरण संपुष्टात येणार असून जंगलातील झाडे जोडपे ही पूर्णपणे नष्ट होणार आहे. या धरणासाठी लाखो वृक्षतोड होणार आहे पोशीर आणि शिलार या धरणासाठी पंधरा हजार एकर जमीन जाण्याची शक्यता आहे. कर्जत मध्ये कोंढाणा धरण व मोरबेधरण झाले आहेत. अजून पोशील धरण व शिलार धरण झाले तर कर्जत तालुक्याचे अस्तित्व संपुष्टात येईल.