Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: अपक्षांमुळे बदलली राजकीय समीकरणे! निवडणूक झाली अधिक चुरशीची, राजकीय गणित बिघडणार?

आघाडी-महायुतीच्या अनेक इच्छुकांनी यंदा तिकीट न मिळाल्यामुळे स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला. आघाडी-महायुतीच्या उमेदवारांसमोर अपक्षांचे आव्हान उभे राहिले आहे. यंदाच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 12, 2026 | 01:47 PM
Raigad News: अपक्षांमुळे बदलली राजकीय समीकरणे! निवडणूक झाली अधिक चुरशीची, राजकीय गणित बिघडणार?

Raigad News: अपक्षांमुळे बदलली राजकीय समीकरणे! निवडणूक झाली अधिक चुरशीची, राजकीय गणित बिघडणार?

Follow Us
Follow Us:
  • पनवेलमध्ये अपक्षांचा जोर वाढला!
  • पनवेल निवडणुकीत काही प्रभाग निर्णायक ठरणार
  • काही प्रभागांत अपक्ष ठरणार ‘किंगमेकर
पनवेल: पनवेल महानगरपालिका निवडणुकीत यंदा महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटप प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवारांचे आव्हान उभे राहिले आहे. उमेदवारी न मिळाल्याने, तिकीट कापल्याने किंवा आघाडी-महायुतीच्या समीकरणात स्थान न मिळाल्यामुळे अनेक इच्छुकांनी स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक या अपक्ष उमेदवारांना मतदारांकडून किती प्रतिसाद मिळतो, यावर अनेक प्रभागांतील निकालांचे गणित ठरणार असल्याने ही निवडणूक अधिकच रंजक बनली आहे. महायुती तसेच महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटप व उमेदवार निश्चितीची प्रक्रिया उशिरा पूर्ण झाली. विशेषतः महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षांची संख्या अधिक असल्याने प्रत्येक जागेवरून दीर्घ चर्चा झाल्या. यामुळे अनेक इच्छुकांना संधी मिळू शकली नाही. याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून त्याचा थेट परिणाम निवडणूक समीकरणांवर होण्याची शक्यता आहे.

Pune Election : एकपक्षीय राजवटीचा भाजपाचा डाव उधळून लावा; प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

कामोठे : प्रभाग १२ ‘क’ आणि १३ मध्ये बंडखोरीचा सूर!

कामोठे परिसरातील प्रभाग क्रमांक १२ ‘क’ आणि १३ मध्येही जागावाटपातून नाराज झालेल्या इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. पक्षांतर्गत असंतोष आणि चिन्हांच्या वाटपावरून झालेल्या मतभेदांमुळे येथे स्वतंत्र लढती उभ्या राहिल्या आहेत. स्थानिक संपर्क आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा यामुळे या अपक्ष उमेदवारांनी या प्रभागांमध्ये प्रभावी आव्हान निर्माण केले आहे. (फोटो सौजन्य – AI Created)

पनवेलमधील एकूण चित्र

एकूणच पनवेल महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची वाढती संख्या प्रस्थापित पक्षांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. अनेक प्रभागांमध्ये थेट लढतींचे रूपांतर आता तिरंगी किंवा बहुकोनी लढतीत होत असून, याचा अंतिम निकालांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रभाग ४ आणि ६ : अपक्षांना अप्रत्यक्ष पाठिंबा?

प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रभागात महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार नसल्याने अपक्ष उमेदवारांना अप्रत्यक्ष पाठिंबा मिळत असल्याची चर्चा आहे. तसेच प्रभाग क्रमांक ६ मध्येही पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आल्याने माजी नगरसेवकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे येथेही समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

प्रभाग ११ ‘क’ : अपक्षांमुळे वाढलेली चुरस

प्रभाग क्रमांक ११ ‘क’ मध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती महिला आणि ओबीसी अशा आरक्षणाच्या जागा असल्याने येथे अनेक इच्छुक होते. जागावाटपात काही जागा आघाडीतील घटक पक्षांना दिल्या गेल्याने इतर इच्छुकांना संधी मिळू शकली नाही. यामुळे महाविकास आघाडीतून मशाल चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या अधिकृत उमेदवारांपुढे ट्रक, सफरचंद, कप बशी या अपक्षांची आव्हान आहे. त्यांनी सुद्धा जोरदार प्रचार केला असून महायुती आणि महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रभाग सध्या अपक्ष उमेदवारांमुळे विशेष चर्चेत आहे.

Aditya Thackeray on BJP: शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी; फडणवीसांची नक्कल करत कोस्टल रोडवरून विचारले प्रश्न

खांदा कॉलनी -प्रभाग १५ : तिरंगी लढतीची चिन्हे!

खांदा कॉलनीतील प्रभाग क्रमांक १५ मध्येही जागावाटपातून नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. या प्रभागात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात असतानाच अपक्ष उमेदवारही कप बशी चिन्हावर प्रभावीपणे मैदानात उतरल्याने येथे तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सामाजिक व धार्मिक उपक्रमांतून निर्माण झालेला जनसंपर्क या प्रभागात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Panvel election independents can change political equations raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • panvel
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: लोणेरेतील शेतात गटाराचे सांडपाणी; पिकांचे नुकसान, संतप्त शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा
1

Raigad News: लोणेरेतील शेतात गटाराचे सांडपाणी; पिकांचे नुकसान, संतप्त शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा

Raigad News: माथेरानमध्ये घोड्यांच्या विष्ठेवरून पर्यावरणाचा प्रश्न; हरित लवाद काय निर्णय देणार? 16 ऑगस्टला महत्त्वाची सुनावणी
2

Raigad News: माथेरानमध्ये घोड्यांच्या विष्ठेवरून पर्यावरणाचा प्रश्न; हरित लवाद काय निर्णय देणार? 16 ऑगस्टला महत्त्वाची सुनावणी

Raigad News: किहीममध्ये संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन; स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला मिळणार नवी दिशा
3

Raigad News: किहीममध्ये संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचे उद्घाटन; स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाला मिळणार नवी दिशा

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी
4

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.