Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पेण: शेकापचा संवाद मेळावा संपन्न; उगवणारा सूर्य शेतकरी कामगार पक्षासाठी…. काय म्हणाले जयंत पाटील

पेण तालुक्यातील आगरी समाज हॉल येथे पेणमधील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 09, 2025 | 04:33 PM
पेण: शेकापचा संवाद मेळावा संपन्न; उगवणारा सूर्य शेतकरी कामगार पक्षासाठी.... काय म्हणाले जयंत पाटील

पेण: शेकापचा संवाद मेळावा संपन्न; उगवणारा सूर्य शेतकरी कामगार पक्षासाठी.... काय म्हणाले जयंत पाटील

Follow Us
Close
Follow Us:

पेण / विजय मोकल :- “उगवणारा सूर्य शेतकरी कामगार पक्षाचा आहे. कार्यकर्त्यांनी आता सावध राहून काम केले पाहिजे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय राऊत यांनी मिडिया समोर येऊन अलिबाग, पेण आणि पनवेलची जागा शेकापला सोडली गेली असून उरणच्या जागेबाबत बोलणे चालू असल्याचे घोषित केले होते. मात्र आयत्या वेळी शिवसनेने याच जागांवर आपले उमेदवार उभे करून आमच्याशी गद्दारी केली. यापुढे गद्दारी सहन केली जाणार नाही.” असा इशारा माजी आमदार जयंतभाई पाटील यांनी पेण येथे आयोजित शेकाप संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना दिला आहे.

आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन आणि शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याचा उत्साह निर्माण करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने संपूर्ण रायगड जिल्हयात कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पेण तालुक्यातील आगरी समाज हॉल येथे पेणमधील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी आमदार जयंतभाई पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, शेकाप चिटणीस सुरेश खैरे, अतुल म्हात्रे, पी डी पाटील, सुप्रिया पाटील, ऍड मानसी म्हात्रे,प्रल्हाद पाटील, ऍड योगेश पाटील, मोहिनी गोरे, प्रकाश सिंगरुत, निलेश म्हात्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाई जयंत पाटील यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे गटावर नाराजी व्यक्त केली. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण व्हावे आणि त्यांना पुन्हा एकदा कामाला लागण्यासाठी त्यांना योग्य त्या सूचना देण्यासाठी आज पेणमध्ये हा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे स्पष्ट करताना शेकापच्या जुन्या व नवीन कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागण्याचा सल्ला देताना दहा लोक असे घडवा ते दहा लाख घडवतील. आपल्या मध्ये राहून इतरत्र बसतात त्यांना खड्यासारखे बाजूला करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. पेण मध्ये शेकापने आमदार निवडून दिला तो त्याचे स्वार्थ साधून आपला पक्ष सोडून गेला. मात्र आता आजच्या तरुण कार्यकर्त्यांनी या गद्दारांना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी सज्ज व्हा. प्रामाणिक कार्यकर्ता आणि निष्ठेने काम करणाऱ्या तसेच पक्ष न बदलणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पदे द्या आशा प्रकरच्या सूचनाही त्यांनी दिल्या. भारतीय जनता पक्षावर टीका करताना भाई जयंत पाटील यांनी पूर्वीचा ओरिजनल भाजप आता राहिला नाही, आत्ताची जवळ्पास पंच्याहत्तर टक्के भाजप ही बाहेरील आमदारांनी भरलेली आहे अशी टिका केली.

जयंत भाईंच्या कार्यकर्त्यांना सूचना

आता पूर्वीचे राजकारण राहीले नसले तरी शेकापचा कार्यकर्ता हा पक्षाशी एकनिष्ठच राहिला पाहिजे. त्यामुळे नव्याने पद भरती करत असताना जे पक्षाशी एकनिष्ठ असतील आणि दलबदलू नसतील अशांनाच पदे द्या, ज्यांना आपण मोठे केले त्यांना धडा शिकवा, हा झालेला संवाद मेळावा व्यापक करा आणि एकत्रीत येऊन पक्ष मजबूत करा.

अतुल म्हात्रे यांच्यावर जयंत पाटील यांची स्तुतीसुमने
आपल्या पक्षाचे खजिनदार अतुल म्हात्रे यांच्या रूपाने आपल्याला एक प्रकाराचे वरदान लाभले आहे. पेण आणि उरण येथे होणाऱ्या तिसऱ्या मुंबईत आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि प्रकल्पग्रस्तांसाठी त्यांचे मोलाचे योगदान आपल्याला लाभणार आहे. आपण सर्वांनी मिळून अतुल म्हात्रे यांना पाठबळ द्या आणि ठेकेदार म्हणून काम करणाऱ्यांना दुर ठेऊन एकदिलाने काम करा असे जयंत भाई पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करते वेळी सांगितले.

Web Title: Pen shekaps dialogue meeting concluded rising sun for the farmer labor party what did jayant patil say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 04:33 PM

Topics:  

  • pen news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात
1

Karjat News : काळ आला पण वेळ नव्हती आली ; नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर अंगावर शहारे आणणारा भीषण अपघात

Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?
2

Raigad Zilla Parishad: रायगडच्या सत्तेसाठी नवे समीकरण; सर्वात मोठा पक्ष असूनही शिंदे गटासाठी संकटाची घंटा?

Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना
3

Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना

Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान
4

Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.