Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad: खुशबू ठाकरे मृत्यूप्रकरणात काँग्रेस आक्रमक; पिडीत कुटुंबियांना न्याय कधी मिळणार हेमंत ओगले यांचा सवाल ?

अमरावती जिल्ह्यातील आदिवासी आमदार हेमंत ओगले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सलग दुसऱ्यांदा खुशबू ठाकरे मृत्यूप्रकरणाबाबत प्रश्न उपस्थित केला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 07, 2025 | 04:29 PM
खुशबू ठाकरे मृत्यूप्रकरणात काँग्रेस आक्रमक; पिडीत कुटुंबियांना न्याय कधी मिळणार हेमंत ओगले यांचा सवाल ?

खुशबू ठाकरे मृत्यूप्रकरणात काँग्रेस आक्रमक; पिडीत कुटुंबियांना न्याय कधी मिळणार हेमंत ओगले यांचा सवाल ?

Follow Us
Close
Follow Us:

कर्जत/ संतोष पेरणे : पेण तालुक्यातील वरवणे शासकीय आदिवासी शाळेतील चौथी मध्ये शिकणारी खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यू प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे आमदार पुढे सरसावले आहेत. अमरावती जिल्ह्यातील आमदार हेमंत ओगले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सलग दुसऱ्यांदा प्रश्न उपस्थित केला.

दरम्यान,खुशबू मृत्यू प्रकरणी तिच्या कुटुंबीयांना न्याय देईपर्यंत आमचा लढा सुरू राहिला असा निर्धार पेण येथील कार्यकर्त्या नंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.
२२ जानेवारी रोजी पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील नऊ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता.सुदृढ असलेल्या खुशबू ठाकरे या मुलीला कुष्ठरोगी ठरवून तिला चुकीची औषधे दिली आणि त्यामुळे कुष्ठरोगाची औषधे सुरू केल्यानंतर अवघ्या महिन्याभरात खुशबू च्या लिव्हर मध्ये सूज आली आणि तिचा मृत्यू झाला. हा प्रश्न अर्थसंकल्प अधिवेशनात काँग्रेस पक्षाचे आमदार हेमंत ओगले यांनी मंगळवारी उपस्थित केला. त्यावेळी या प्रकरणी शासकीय आश्रमशाळा व्यवस्थापन यांनी पालकांना न कळविणे,आरोग्य विभागाने पुरेशी खात्री न करणे आणि पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यात केलेली कुचराई याबाबत ताशेरे अधिवेशनात एक तासाच्या प्रश्न उत्तराच्या तासात ओढले होते.

मात्र त्यावेळी सरकार कडून कोणतेही उत्तर आले नव्हते. हा प्रश्न पुन्हा एकदा स्थानिक आदिवासी समाज आणि कार्यकर्ते उपोषणाला बसण्याच्या तयारीत असल्याचे सभागृहाचे निदर्शनास आणून दिले होते.खुशबूचे मृत्यू प्रकरणी सरकार आमदारांच्या अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याचे गांभीर्य ठेवत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आज ७ मार्च रोजी अमरावती जिल्ह्यातील आमदार आदिवासी समाजाचे हेमंत ओगले यांनी पुन्हा एकदा हा प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला.

यावेळी आमदार ओगले यांनी खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणी सरकारने चुकीची औषधे देणाऱ्या पेण तालुक्यातील कामार्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई करावी.तसेच पेण तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या वरवणे शासकीय आश्रमशाळा व्यवस्थापन यांच्यावर कारवाई करावी अशी आग्रही मागणी केली आहे.त्यामुळे याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेण तालुक्यातील वरवणे शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील चौथी मध्ये शिकणारी खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यू प्रकरणी सरकार कडून ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळा मधील खुशबू नामदेव ठाकरे मृत्यू प्रकरणी आवाज उठविणाऱ्या राजीव गांधी पंचायत राज मिशनचे राष्ट्रीय सचिव नंदा म्हात्रे यांनी आमदार हेमंत ओगले यांचे आभार मानले आहेत.हा लढा खुशबू ठाकरे मृत्यू प्रकरणी ठाकरे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील असा निर्धार पेण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.तर आदिवासी समाजातील पालकांना आपल्या पाल्यांना आश्रमशाळेत पाठवण्याची भीती वाटू लागली आहे.त्यासाठी सरकारने असे प्रकार घडल्यावर कारवाई करावी आणि आदिवासी समाजाला आश्वस्त करावे अशी सूचना आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी यांनी केली आहे.

Web Title: Raigad congress is aggressive in khushboo thackerays death case hemant ogle questions when will the victims family get justice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2025 | 03:09 PM

Topics:  

  • pen news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला दिरंगाई, गावकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
1

Karjat News : शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला दिरंगाई, गावकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

Matheran News : वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे नेरळ माथेरान घाटरस्ता सुरळीत; सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी
2

Matheran News : वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे नेरळ माथेरान घाटरस्ता सुरळीत; सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.