
Raigad News: उरण नगरपरिषदेत राजकीय संघर्ष; बहुमताचा खेळ की विकासाला अडथळा? नागरिकांच्या कामांवर होणार परिणाम
डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या भावना घाणेकर यांची नगराध्यक्षपदी निवड झाली होती. त्याचवेळी मविआचे आठ नगरसेवक निवडून आले, तर भाजपाचे १२ नगरसेवक विजयी झाले. त्यामुळे नगराध्यक्षपद गमावूनही भाजपाकडे नगरपरिषदेमध्ये संख्याबळ टिकून राहिले. याच बहुमताच्या जोरावर सभागृहातील निर्णय प्रक्रियेत भाजपाचा प्रभाव कायम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. (फोटो सौजन्य – AI Created)
एकंदरीत, निवडणुकीनंतर चार महिन्यांनंतरही उरण नगरपरिषदेमधील राजकीय वातावरण तापलेलेच असल्याचे या सभेतून दिसून आले. बहुमताच्या जोरावर घेतले जाणारे निर्णय आणि विकासकामांवर होणारा परिणाम यामुळे “राजकारण की विकास?” असा प्रश्न आता नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
शुक्रवारी झालेल्या सभेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या विविध कामांसाठी ठराव मांडण्यात आले होते. मात्र, विरोधकांनी निधीअभावाचे कारण देत या ठरावांना विरोध केला. यामध्ये पाणीपुरवठा टाक्यांची स्वच्छता, बोरी गावातील रस्त्याची दुरुस्ती, बोरी गावातील मुख्य नाल्यालगत सुरक्षा भित उभारणे, स्मशानभूमीचे सुशोभीकरण, गटार बांधकाम व दुरुस्ती, अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधक बसविणे. ही सर्व कामे नागरिकांच्या सुरक्षेशी आणि आरोग्याशी थेट संबंधित असतानाही विरोध झाल्याने चिता व्यक्त केली.
सभेमध्ये प्रत्येक ठरावावर मतदान घेतले असता १० विरुद्ध १२ अशा मतांनी ठराव नामंजूर करण्यात आले. यावेळी नगरसेवक अतुल ठाकूर, प्रमिला पवार आणि स्वीकृत सदस्य गणेश शिंदे यांनी नागरी सुविधा लक्षात घेऊन ठराव मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र विरोधकांच्या एकजुटीपुढे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
Shahapur News : शहापूरच्या जंगलात आगीचा तांडव; वणव्यामुळे हजारो हेक्टर हिरवाई जळून खाक
सभेत राजकीय भूमिका ठामपणे मांडताना विरोधकांनी निधीअभावाचा मुद्दा पुढे केला असला, तरी नागरिकांच्या मूलभूत गरजांवर परिणाम होणाऱ्या कामांना विरोध केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा जवळ येत असताना ही कामे रखडल्यास नागरी समस्या, आरोग्याच्या समस्या आणि अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की, “विरोधकांनी राजकारण करणे स्वाभाविक आहे. मात्र नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. पावसाळ्यापूर्वीची कामे तातडीने होणे गरजेचे आहे. अन्यथा गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल.