Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिकीट गैरवापर रोखण्यासाठी रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; आता खऱ्या प्रवाशांना मिळणार दिलासा

प्रवाशांना अधिक नियोजन करता यावे यासाठी तिकीट रद्द करण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. पूर्वी असलेली ४८, १२ आणि ४ तासांची मर्यादा आता अनुक्रमे ७२, २४ आणि ८ तास करण्यात आली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 26, 2026 | 03:11 PM
तिकीट गैरवापर रोखण्यासाठी रेल्वेने घेतला 'हा' मोठा निर्णय; आता खऱ्या प्रवाशांना मिळणार दिलासा

तिकीट गैरवापर रोखण्यासाठी रेल्वेने घेतला 'हा' मोठा निर्णय; आता खऱ्या प्रवाशांना मिळणार दिलासा

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : प्रवाशांच्या सोयीसाठी आणि तिकीट प्रणालीतील गैरवापर रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने महत्त्वाचे निर्णय घेतले असून, लवकरच प्रवाशांना गाडी सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत आपले बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा मिळणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी (ता.२४) या पाच नव्या सुधारणांना मंजुरी दिली. यामुळे २०२६ मधील रेल्वे सुधारणा उपक्रमांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. प्रवाशांना कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता तिकीट उपलब्ध व्हावे आणि शेवटच्या क्षणी होणारी सट्टेबाजीची बुकिंग थांबवावी, हा या सुधारणांचा मुख्य उद्देश असल्याचे वैष्णव यांनी सांगितले.

तत्काळ तिकीट प्रणालीचा गैरवापर आणि तिकिटांचा काळाबाजार ही मोठी समस्या बनली होती. यावर उपाय म्हणून रेल्वेने बॉट्स आणि फसवे सॉफ्टवेअर ओळखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली आहे. तसेच आधार आधारित ओटीपी पडताळणी सुरू करण्यात आली. डेटा विश्लेषणातून आयआरसीटीसी प्रणालीतील सुमारे ३ कोटी बनावट खाती शोधून काढून ती बंद करण्यात आली असून, त्यामुळे तिकिटांच्या उपलब्धतेत सुधारणा झाल्याचा दावा रेल्वेने केला आहे.

दरम्यान, पूर्वी केवळ मूळ स्थानकावरच तिकीट रद्द करण्याची अट होती. ती आता काढून टाकण्यात येणार असून, देशातील कोणत्याही रेल्वे स्थानकावरून तिकीट रद्द करता येणार आहे. ई-तिकिटांसाठी टीडीआर (Ticket Deposit Receipt) दाखल करण्याची अटही हटवण्यात आली असून, तिकीट रद्द केल्यानंतर परतावा स्वयंचलितपणे दिला जाणार आहे.

प्रवास वर्ग अपग्रेडची सुविधा पुरविणार

गाडी सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत प्रवास वर्ग (क्लास) अपग्रेड करण्याची संधी मिळणार आहे. पूर्वी ही सुविधा केवळ आरक्षण चार्ट तयार होण्यापूर्वीच उपलब्ध होती. नवीन नियमानुसार, प्रवासी गाडी मूळ स्थानकावरून सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत डिजिटल पद्धतीने आपले बोर्डिंग स्टेशन बदलू शकतील. त्यामुळे एखादा प्रवासी मूळ स्थानकावर गाडीत चढू शकला नाही तरी त्याची जागा रद्द होणार नाही आणि तो पुढील सोयीच्या स्थानकावरून प्रवास करू शकेल.

तिकीट रद्द करण्याच्या वेळेत केला बदल

प्रवाशांना अधिक नियोजन करता यावे यासाठी तिकीट रद्द करण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. पूर्वी असलेली ४८, १२ आणि ४ तासांची मर्यादा आता अनुक्रमे ७२, २४ आणि ८ तास करण्यात आली आहे. तसेच आरक्षण चार्ट आता गाडी सुटण्याच्या ४ तासांऐवजी ९ ते १८ तास आधी तयार केला जाणार आहे. यामुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना पर्यायी नियोजन करता येणार आहे.

हेदेखील वाचा : India NDC Paris Agreement : भारताच्या हवाई क्षेत्राला मिळाले नवे पंख; केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली उड्डाण 2.0 ला मंजूरी

Web Title: Railways take major decision to curb ticket misuse genuine passengers to get relief

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • Indian Railways
  • Railway Ticket

संबंधित बातम्या

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम केले लागू
1

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम केले लागू

उन्हाळ्यात गावी जायचंय? Central Railway ने प्रवाशांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा
2

उन्हाळ्यात गावी जायचंय? Central Railway ने प्रवाशांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.