Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माढ्यातील उंदरगावमध्ये पूर परिस्थिती, फळबागांचे नुकसान; तालुक्यातील पिके पाण्याखाली

गेल्या काही दिवसांपासून माढा तालुक्यातील गावांमध्ये सततच्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 23, 2025 | 07:18 PM
माढ्यातील उंदरगावमध्ये पूर परिस्थिती, फळबागांचे नुकसान; तालुक्यातील पिके पाण्याखाली
Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : राज्यभरात परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून माढा तालुक्यातील गावांमध्ये सततच्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. माढा तालुक्यातील उंदरगाव परिसरास रात्री पावसाने झोडपून काढले. या परिसरातील ओढे, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. हजारो एकर पिकात पाणी साठून राहिले आहे. या परिस्थितीची पाहणी आमदार अभिजित पाटील यांनी केली. त्यांच्यासमवेत तहसीलदार गटविकास अधिकारी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकारी सोबत होते.

अहवाल पाठवण्याच्या सूचना

आमदार पाटील यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ऊस, डाळिंब, बोर, मका यासह इतर शेती पिकांची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली. आमदार पाटील यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेती पिके व फळबागांचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवण्याच्या सूचना तहसीलदारांना केल्या.

शेतकऱ्यांच्या घरात घुसले पाणी

आमदार पाटील यांच्या गाड्यांचा ताफा जसा जसा पुढे जात होता, तसे तसे शेतकरी रस्त्यावर येऊन उभे राहत होते. शेत पिकांचे झालेले नुकसान दाखवत होते. ओढ्यातून पाणी ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांत साठले होते. या सर्व परिस्थितीची पाहणी आमदार पाटील यांनी केली. उंदरगाव येथील काही शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी घुसले होते, याबाबत तहसीलदारांना पंचनामे करण्याचे आदेश दिले.

हे सुद्धा वाचा : पदाधिकाऱ्याला साडी नेसवल्यावरुन काँग्रेस आक्रमक; बड्या नेत्याने भाजपला दिला इशारा

मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश

मराठवाड्यासह राज्यभरात अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. बीड, मराठवाडा, अहिल्यानगर आणि इतर अनेक जिल्ह्यांनाही अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहा:कार माजवला आहे. ज्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील या पूरपरिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या नुकसानाला सामोरे जात आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक अडकले आहेत. प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पूरस्थितीची सविस्तर माहिती घेतली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्यांतील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी उद्या पालकमंत्र्यांना पूरग्रस्त भागांना भेट देऊन पाहाणी करा, असे सांगितले आहे.

Web Title: Rains in madha have caused major damage to farmers crops

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 07:18 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Madha

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik : अतिवृष्टीच्या जखमांवर मायेचा हात! शेतकऱ्यांसाठी १०१ देशी गाई म्हणजे नवसंजीवनी, पालकमंत्री सरनाईक
1

Pratap Sarnaik : अतिवृष्टीच्या जखमांवर मायेचा हात! शेतकऱ्यांसाठी १०१ देशी गाई म्हणजे नवसंजीवनी, पालकमंत्री सरनाईक

Pune Book Festival : महाराष्ट्र हे साहित्य निर्मितीचे नंदनवन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुणे पुस्तक महोत्सवातून गौरवोद्गार
2

Pune Book Festival : महाराष्ट्र हे साहित्य निर्मितीचे नंदनवन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुणे पुस्तक महोत्सवातून गौरवोद्गार

जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ, कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार; महाडिकांनी स्पष्टच सांगितलं
3

जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ, कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार; महाडिकांनी स्पष्टच सांगितलं

सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीत ड्रग्सच्या पैशाचा महापूर, ‘उडता महाराष्ट्र’ बनवण्याचे षडयंत्र; सपकाळांचा घणाघात
4

सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीत ड्रग्सच्या पैशाचा महापूर, ‘उडता महाराष्ट्र’ बनवण्याचे षडयंत्र; सपकाळांचा घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.