मीरा-भाईंदर: राज ठाकरे हे मीरा भाईंदर येथे दाखल झाले आहे. आज मीरा भाईंदर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळेस माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेला संबोधित केले. मीरा भाईंदरमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेवरून देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले. राज ठाकरे नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
मीरा रोडमधील सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “काही दिवसापूर्वी इथे जो मिठाईवाल्याचा प्रसंग घडला. आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर, कानाखाली मराठी बसणारच. विनाकारण काहीतरी काढत असतात. माझे महाराष्ट्र सैनिक पाणी प्यायला गेले. त्यांना विचारले कशासाठी मोर्चाचे काढताय? तर हिंदी सक्ती केली म्हणून मोर्चा काढतोय असे महाराष्ट्र सैनिक म्हणाले. त्यांच्या संभाषणातील त्या माणसाच्या अरेरावीमुळे त्याच्या कानफाटीत बसायची होती ती बसली. तर इकडच्या सर्व व्यापाऱ्यानी बंद पुकारला. तुमच्या मारली होती का? अजून मारली नाहीये.”
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात राहताय. शांतपणे रहा. मराठी शिका. आमचे तुमच्याशी काही भांडण नाहीये. तर इथे मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणारच. हिंदी भाषा वाईट नाही पण लादणार असाल विरोध करणार. आम्ही हिंदू आहोत. हिंदी नाही. मीरारोड ते पालघरचा पट्टा गुजरातमध्ये सामील करण्याचा डाव आहे. मुंबई महानगर प्रदेसहतील मतदारसंघ अमराठी लोकांचा डाव आहे. मुंबई गुजरातमध्ये सामील करायची हि यांची स्वप्ने आहेत.”
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, “अटकेपार झेंडे फडकवले.कटकच्या किल्ल्यावर झेंडा फडकवला. तो महाराष्ट्र यांच्यासमोर हात पसरतोय? न्याय द्या म्हणून आम्ही भिका मागायच्या? स्वतःहोऊन आपल्याला काही करायची गरज नाहीये. जर अशा प्रकारे माज घेऊन कोणी अंगावर आला तर ठेचायचा म्हणजे ठेचायचाच.”
ठाकरे गट-मनसे युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
“२० वर्षांनंतर एका व्यासपीठावर आम्ही एकत्र आलो. पहिल्यांदा आम्ही मराठीच्या विषयावर एकत्र आलो. ते मी आधीच सांगितलं की आम्ही एकत्र आलोय तर ते एकत्र राहण्यासाठीच. मराठीच्या विषयावर आम्ही एकत्रच राहणार आहोत. पुढे मुद्दा येतो तो राजकारणाचा. आता कोणतीही निवडणूक जाहीर झालेली नाही. जेव्हा निवडणूक जाहीर होईल, त्यावेळी आम्ही चर्चा करू,” असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.