
रक्तदानातून समाजात माणुसकी, बंधुभाव आणि एकतेचा संदेश जातो. शिवाय रक्तदान हीच खरी देशभक्ती आणि समाजसेवा आहे. म्हणून प्रत्येक सक्षम नागरिकाने वर्षातून किमान दोन वेळा स्वेच्छेने रक्तदान केले पाहिजे. भीती, गैरसमज बाजूला ठेवून आपण पुढे आलो पाहिजे. कारण तुमचे एक थेंब रक्त कोणासाठीतरी संजीवनी ठरू शकते, असेही नमूद केले.
यावेळी आमदार प्रमोद जठार, भाजपाचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा सरचिटणीस सुप्रिया उत्तेकर, अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत शहा, उपनगराध्यक्षा रुपाली दांडेकर, जिल्हा चिटणीस योगेश शिर्के, शहर मंडळ अध्यक्ष शशिकांत मोदी, ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष आदिती गुडेकर, शहर सरचिटणीस सारिका भावे, आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेवक संदीप भिसे, नगरसेविका अंजली कदम, नगरसेविक शीतल रानडे, सहकार सेल जिल्हाध्यक्ष रत्नदीप देवळेकर, चिपळूण ग्रामीण प्रभारी रामदास राणे, युवा मोर्चा सरचिटणी कुणाल आंबेकर, महेश दीक्षित, इम्तियाज कडू, संजय शेरे, नरेंद्र बेलवलकर, विलास चव्हाण, रुही खेडेकर, सपना भिसे, माधुरी शिंदे, श्रुती जोशी, पूजा कदम, ज्योती देसाई, विभावरी जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Chiplun Flood News : अचानक वाढलेल्या वशिष्ठीच्या पाण्यात अडकले कुटुंब , एनरॉन परिसरातील थरार प्रसंग