Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News: किनारी वाऱ्यांमुळे जाळे रिकामे; मासेमारी व्यवसाय संकटात अन्…

गेल्या चार दिवसांपासून समुद्रात उत्तरेकडून जोरदार थंड वारे वाहत असल्याने मासळीने स्थलांतर केले आहे. परिणामी जाळ्यात मासळी मिळत नसल्याने मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटींना तोटा सहन करावा लागत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 22, 2026 | 02:32 PM
Ratnagiri News: किनारी वाऱ्यांमुळे जाळे रिकामे; मासेमारी व्यवसाय संकटात अन्…
Follow Us
Close
Follow Us:

किनारी वाऱ्यांमुळे मासेमारी व्यवसाय संकटात
आर्थिक गणित कोलमडल्यामुळे चिंता
पुढील तीन ते चार दिवस समदात स्थिती कायम

गुहागर: समुद्रात उत्तरेकडून वाहणाऱ्या जोरदार थंड वाऱ्यामुळे मासळी स्थलांतरित झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. गेल्या चार दिवसांपासून मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या बोटींना रोजच्या खर्चाइतकीही मासळी मिळत नसल्याने मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार मासेमारी नौकांद्वारे हा व्यवसाय चालतो.

या व्यवसायावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून असून मासळी व्यवसायाशी संबंधित बर्फ उद्योग, वाहतूक, विक्री आदी पूरक व्यवसायही यावरच चालतात. मात्र कधी परप्रांतीय नौकांकडून होणाऱ्या अनधिकृत मासेमारीमुळे, तर कधी निसर्गातील अचानक बदलांमुळे हा व्यवसाय संकटात सापडतो.

मच्छीमार व्यवसायाकरिता अद्ययावत, प्रशस्त जेट्टीची मागणी; मंत्री नितेश राणेंना दिले निवेदन

उत्तरेकडून जोरदार थंड वारे; मासळीचे स्थलांतर
गेल्या चार दिवसांपासून समुद्रात उत्तरेकडून जोरदार थंड वारे वाहत असल्याने मासळीने स्थलांतर केले आहे. परिणामी जाळ्यात मासळी मिळत नसल्याने मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या बोटींना तोटा सहन करावा लागत आहे. अनेक वेळा खर्चाच्या तुलनेत उत्पन्न शून्य असल्याने नौकामालकांवर आर्थिक बोजा वाढला आहे.

नौका बंदरातच नांगरून ठेवण्याला दिले प्राधान्य
मासेमारी करताना नौकांना इंधन, खलाशांसाठी रेशन व पाणी, तसेच खलाशांचे साप्ताहिक वेतन असा मोठा खर्च करावा लागतो. मात्र मासळीच न मिळाल्याने हा खर्चही वसूल होत नसल्याने मच्छीमार अडचणीत आले आहेत. यामुळे परिस्थिती निवळेपर्यंत अनेक मच्छीमारांनी आपापल्या नौका बंदरातच नांगरून ठेवण्याला प्राधान्य दिले आहे.

Sindhudurga News: “सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालयासाठी…”; कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचे निर्देश

पुढील तीन ते चार दिवस समुद्रात स्थिती कायम
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवस समुद्रातील हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असून, त्यामुळे मासेमारी व्यवसायावर आणखी परिणाम होण्याची भीती मच्छिमार व्यक्त करत आहेत.

मंत्री नितेश राणेंना दिले निवेदन

मंडणगड तालुक्यातील किनारी भागात असलेल्या वाल्मिकीनगर येथे मच्छिमार व्यवसायाकरिता अद्यावत व प्रशस्त जेट्टीची निर्मिती करण्याची मागणी फिशरीज वेलफेअर फौंडेशनचे अध्यक्ष सुनील खाडे, उपाध्यक्ष हेमंत सालदुरकर यांनी बंदरविकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली असून त्या मागणीच्या अनुषंगाने संबंधित महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने कार्यवाही सुरु असल्याची माहिती फिशरीज वेलफेअर फौंडेशनचे अध्यक्ष सुनील खाडे यांनी दिली, फिशरीज वेलफेअर फौंडेशनचे अध्यक्ष सुनील खाडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, अरबी समुद्र आणि सावित्री नदीच्या संगमानजिक असलेले वाल्मिकीनगर या गावातील मत्स्यव्यवसाय हा पारंपारिक व्यवसाय असून येथील जवळपास सर्वच कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन मत्स्यव्यवसाय हा आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Coastal winds have put the fishing industry in jeopardy guhagar ratnagiri news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 02:32 PM

Topics:  

  • Fishermen community
  • Fishery
  • Konkan

संबंधित बातम्या

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट
1

SINDHUDURG : कोकणात आंबा बागायतदार संकटात; पालकमंत्री नितेश राणेंची बागांना भेट

मध्यपूर्वेतील युद्धाचा मत्स्य व्यवसायावर परिणाम? कोकणातील कोळी बांधव चिंतेत
2

मध्यपूर्वेतील युद्धाचा मत्स्य व्यवसायावर परिणाम? कोकणातील कोळी बांधव चिंतेत

‘हा’ आहे महाराष्ट्राचा राज्यमासा! पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी, जाणून घेऊया माशाबद्दल सविस्तर माहिती
3

‘हा’ आहे महाराष्ट्राचा राज्यमासा! पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी, जाणून घेऊया माशाबद्दल सविस्तर माहिती

रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना मोठा दिलासा; प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत तब्बल ‘इतका’ निधी झाला प्राप्त
4

रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना मोठा दिलासा; प्रतिपूर्ती योजनेअंतर्गत तब्बल ‘इतका’ निधी झाला प्राप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.