
कोकण रेल्वेचे अजब नियोजन
शिमगोत्सवाच्या ‘प्लॅनिंग’ वर संताप
होळीसाठी ३ दिवस आधीच स्पेशल गाड्या
सावंतवाडी: कोकणच्या सर्वांत मोठ्या ‘शिमगोत्सवा‘साठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या जखमेवर रेल्वे प्रशासनाने मीठ चोळले आहे. सोमवारी दि. २ मार्च २०२६ रोजी होळी असताना, रेल्वेने चक्क तीन दिवस आधी म्हणजेच दि. २६ फेब्रुवारीलाच स्पेशल गाड्यांचे नियोजन केल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. हे नियोजन प्रवाशांच्या सोयीसाठी आहे की केवळ कागदोपत्री गाड्या धावण्यासाठी? असा जळजळीत प्रश्न आता विचारला जात आहे.
सोमवारी होळी असताना चाकरमानी साधारणपणे शुक्रवार दि. २७ रोजी रात्री किंवा शनिवारी गावी जाणे पसंत करतात. मात्र, रेल्वेने एलटीटी-सावंतवाडी आणि सीएसएमटी-सावंतवाडी या दोन्ही महत्त्वाच्या गाड्या गुरुवारी दि. २६ फेब्रुवारीलाच सकाळी आणि रात्री सोडल्या आहेत. कामावरून सुटून शुक्रवारी रात्री गावी जाणाऱ्या नोकरदारांसाठी एकही सोयीची स्पेशल ट्रेन या नियोजनात दिसत नाही. गुरुवारी सकाळी गाडी सोडल्यास नोकरदारांनी सुट्टी घेऊन जायचे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Kokan Railway: कोकणवासियांसाठी खुशखबर! ‘या’ गाड्यांना कणकवली,सिंधुदुर्गात मिळणार थांबा
मुंबई-सावंतवाडी दरम्यान धावणार ‘होळी स्पेशल’
होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते सावंतवाडी रोड (एसडब्ल्यूकी) दरम्यान ‘होळी स्पेशल’ रेल्वेच्या ४ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०१११९ आणि ०११२० या साप्ताहिक विशेष गाड्या खालीलप्रमाणे धावतील गाडी क्र. ०१११९ (एलटीटी ते सावंतवाडी रोड) दि. २६ फेब्रुवारी आणि दि. ५ मार्च २०२६ वेळ मुंबईहून रात्री २२:१५ वाजता सुटेल आणि दुसन्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता सावंतवाडीला पोहोचेल.
लोकप्रतिनिधींनो, आता तरी आवाज उठवा !
दि. २ मार्चच्या होळीसाठी दि. २६ फेब्रुवारीला गाड्या सोडणे, हे रेल्वेचे ‘प्लॅनिंग’ प्रवाशांच्या डोक्यावरून जात आहे. कोकणी माणस्राची सहनशीलता पाहून रेल्वे प्रशासन मुद्दाम असे अजब वेळापत्रक लादतेय का?, असा संशय आता व्यक्त केला जात आहे. एकीकडे ‘मत्स्यगंधा’ आणि ‘कोकणकन्या यांसारख्या नियमित गाड्या तासनतास उशिराने धावत आहेत, तर दुसरीकडे उत्सवाच्या काळातही अशा प्रकारे नियोजन शून्य स्पेशल गाड्या सोडल्या जात आहेत. माजी खासदारांनी नुकतीच अधिकाऱ्यांची भेट घेतली असली, तरी रेल्वेचे हे ‘गुरुवारी गाडी आणि सोमवारी होळी’ असे व्यस्त गणित सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधींनी तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.