
रत्नागिरी जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा
जिल्हाधिकाऱ्यांनी साधला ग्राहकांशी संवाद
जिल्हास्तरावर विशेष समित्या स्थापन करणार
रत्नागिरी: जिल्ह्यातील सर्वच ग्राहकांना घरगुती गॅस चांगल्या प्रकारे उपलब्ध होत असल्याचे चित्र दिसून येत असून रत्नागिरीतील गॅस वितरण एजन्सिज योग्य प्रकारे गॅस सिलिंडरचे वितरण करीत आहेत. गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्या बाबतच्या बातम्या निराधार असून आज रत्नागिरीतील विविध ठिकाणच्या गॅस सिलिंडर वितरण केंद्रांवरील गॅस सिलिंडरसाठीची गर्दी ओसरल्याचे चित्र दिसून आले. गेल्या दोन तीन दिवसात सिलिंडरचा तुटवडा असल्याच्या बातम्या काही माध्यमांवर पसरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.
मात्र रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने अत्यंत कुशलतेने याबाबतची स्थिती हाताळली. आजही जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी रत्नागिरी येथील शांतादुर्गा गॅस एजन्सीच्या ठिकाणी भेट देऊन तेथील व्यवस्थापनाशी चर्चा केली आणि त्या ठिकाणी गॅस साठी आलेल्या ग्राहकांची संवाद साधला. कोणत्याही प्रकारे गॅस सिलिंडरची टंचाई जिल्ह्यात नसल्याची आणि पुरेसा गॅस सिलिंडरचा साठा असल्याची माहिती जिल्हाधिकारी जिंदल यांनी गॅस ग्राहकांना दिली. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी येथील मे. शांतादुर्गा गॅस एजन्सीला भेट देऊन तेथील व्यवस्थापनाशी आणि ग्राहकांशी थेट संवाद साधला.
४५ दिवसांनी सिलिडर मिळणार हे वृत्त चुकीचे आहे. २५ दिवसात घरगुती गॅसचा पुरवठा झाला पाहिजे. जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा आहे. बुकींगसाठी ग्राहकांनी व्हॉट्स अॅपचा वापर करावा. ग्राहकांनी अजिबात पॅनिक होऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी जिंदल यांनी यावेळी गॅस एजन्सीच्या व्यवस्थापनाला बुकींग संदर्भात माहिती देणारा फलक दर्शनी भागात लावण्याबाबत सूचना दिली.
ग्राहकांचे येणारे फोन घेऊन, त्यांना समाधानकारक उत्तरे द्यावीत. त्यांच्या शंकांचे निरसन करावे. बुकींगची यादी कमी करण्याबाबत नियोजन करावे. ग्राहकांना २५ दिवसात गॅस सिलेंडर मिळाले पाहिजे, अशी सूचनाही दिली. माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले, ग्राहकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, तहसिलदार राजाराम म्हात्रे उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यात LPG Gas च्या काळाबाजाराबाबत एकही FIR नाही? मग सिलेंडरसाठी रांगा का?
LPG सिलेंडर डिलिव्हरीच्या नावाखाली सुरु आहे मोठा स्कॅम
ईरान आणि ईस्रात्रल-अमेरिका यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे भारतात तेल आणि गॅस टंचाई निर्माण झाली आहे. याचा परिणाम भारतातील घरांमध्ये, हॉटेल्स आणि खानावळीवर देखील होत असल्याचे पाहाला मिळत आहे. गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. लोकं जास्तीचे पैसे देऊन लवकरात लवकर गॅस सिलेंडर कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकांच्या याच अडचणींचा फायदा स्कॅमर्सनी घेतल आहे.