
आखाती युद्धामुळे तांदूळ व्यवसायाला फटका! गडचिरोलीतील तांदूळ निर्यात ठप्प; परदेशातून मागणीला 'ब्रेक'
गडचिरोली जिल्ह्यात धान लागवडीखाली सर्वाधिक क्षेत्र असलेला तालुका म्हणून चामोर्शी ओळखला जातो. उच्च प्रतीच्या धान उत्पादनामुळे येथे मोठ्या प्रमाणावर राईस मिल्स कार्यरत असून येथील तांदूळ देशात तसेच परदेशात पाठविला जातो. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून आखाती देशांतील युद्धपरिस्थितीचा तांदूळ व्यापारावर परिणाम झाला आहे. निर्यात मंदावल्याने तांदूळ उत्पादक आणि व्यावसायिकांची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे.(फोटो सौजन्य – AI)
वर्षभरात पीक नुकसानीच्या ३ हजार घटना! वन्यप्राणी हल्ले; अनुदान वितरणात वडसा वनविभाग अव्वल
जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकरी श्रीराम, जयप्रकाश, मोहरा, बासमती या बारीक पोत असलेल्या धानाची लागवड करीत असतात. बाजरपेठेत सध्या याच उच्च प्रतितीच्या तांदळाला देशात व देशाबाहेर मोठी मागणी आहे. मात्र गेल्या १५ दिवसांपासून आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणीला ब्रेक लागला आहे. परिणामी जिल्ह्यासह तालुक्यातील तांदूळ व्यवसायावर व शेतकऱ्यांवर विपरित परिणाम झाला आहे. सध्या आखाती युद्धामुळे सागरी मार्गावर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे बासमती तांदूळ आणी अनेक वस्तुची मागणी कमी झाली आहे. याची व्यावसायिकांना मोठी झळ सोसावी लागत आहे.
तालुक्यातील उत्तम प्रतीच्या तांदळाला बाहेर देशात व देशात मोठी मागणी आहे. मात्र गेल्या १५ दिवसांपासून आखाती देशांमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात अर्ध्यावर आली आहे. शेतकऱ्याला व तांदूळ उत्पादक व्यवसायाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने आर्थिक फटका बसत आहे. शेतकरी व तांदूळ उत्पादक व्यावसायिक संकटात सापडले आहेत. जोपर्यंत युद्ध थांबत नाही, तोपर्यंत तांदूळ निर्यात होऊ शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे.
गावखेड्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट! नागरिकांच्या जिवाशी खेळ, समितीकडून झाडाझडती तरीही आळा बसेना
आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या 66 युद्धामुळे बाहेर देशात तादूळ जात नसल्यामुळे कमी दराने देशातच तांदूळ विकण्याची पाळी आली आहे. त्यामुळे याचा फटका तांदूळ व्यवसायावर बसला आहे, चंद्रकांत दोषी, उद्योजक महावीर राईस मिल चामोर्शी, यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. युद्धाचा संपूर्ण देशभरात परिणाम दिसून येत आहे.