Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सााताऱ्यातील तीळगंगा नदी मळीमिश्रित पाण्यामुळे प्रदूषित; नागरिकांच्या आराेग्यास धाेका

गेले काही दिवसापासून जरंडेश्वर कारखान्याची मळी मिश्रित रासायनिक पाणी जांभूळ ओढा मार्गे तीळगंगा नदीत येत असल्यामुळे कुमठे, आसरे, कोरेगाव गावातील लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 20, 2024 | 11:38 AM
सााताऱ्यातील तीळगंगा नदी मळीमिश्रित पाण्यामुळे प्रदूषित; नागरिकांच्या आराेग्यास धाेका
Follow Us
Follow Us:

कोरेगाव : गेले काही दिवसापासून जरंडेश्वर कारखान्याची मळी मिश्रित रासायनिक पाणी जांभूळ ओढा मार्गे तीळगंगा नदीत येत असल्यामुळे कुमठे, आसरे, कोरेगाव गावातील लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. पंचगंगेच्या पाण्यामुळे शिराळा तालुक्यात वाढलेल्या कॅन्सर पेशंटची रुग्ण संख्या पाहता दूषित पाण्यामुळे भूगर्भातील जलस्त्रोत खराब झाले तर कॅन्सरचे रुग्ण वाढण्याची दाट शक्यता आहे. याबाबत कुमठेचे सरपंच यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असल्याचे सांगितले.

मागच्या आठवड्यात कारखाना परिक्षेत्रात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. गेल्या चार-पाच दिवसांपासून तीळ गंगा नदी पात्रात मळीमिश्रित पाणी येण्याचे प्रमाण हळूहळू वाढत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. सोमवारी सकाळी तिळगंगा नदीतील पात्रात मिसळलेल्या दूषित पाण्याचा फेस वाहत्या पाण्यात जास्त प्रमाणात दिसून आला. कारखान्याच्या दूषित पाण्यामुळे शेतकरी, जनावरे व नागरिक यांचे खूपच हाल होत आहेत. कारखान्यापासून वाहत असलेल्या जांभूळओढा पात्रात जवळपास २० पेक्षा जास्त अधिक विहिरी आहेत. धुणे भांडी, जनावरांचे पाणी, शेतीचे पाणी, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची परवड होण्याची शक्यता आहे. तीळ गंगा नदी काठावरील बहुसंख्य विहिरी, बोअरवेलमध्ये रासायनिक पाणी झिरपणार असून यामुळे कॅन्सर सारख्या भयानक रोगाला सर्वसामान्य जनता बळी पडणार आहे.

जलचर प्राणी मृत्यूमुखी

दूषित पाणी तीळगंगा नदी पात्रात आल्याने मोठ्या प्रमाणात जलचर प्राणी मृत्यूमुखी पडले आहेत. प्रशासनाने तत्काळ पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीतील पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करणे काळाची गरज आहे. दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोगराई होण्याची भीती आहे. तरी लवकरात लवकर दूषित पाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष

तीळगंगा नदीतील दूषित पाणी पुढे जाऊन कृष्णा नदीच्या पात्रात जात आहे. हेच दूषित पाणी कमी अधिक प्रमाणात पुन्हा नळावाटे कोरेगावकरांच्या घराघरात जाणार आहे. यापूर्वीही जागरुक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही जिल्हा प्रशासन व प्रदूषण विभागाचा राजकीय वरदहस्त असल्याने कारखान्यावर कोणतीही कारवाही हाेत नसल्याचा आराेप हाेत आहे.

 

Web Title: River tilganga in saatara polluted by muddy water a threat to the health of citizens nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2024 | 11:37 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • Koregaon
  • maharashtra

संबंधित बातम्या

Karjat Protest : कर्जतमध्ये आंदोलन तीव्र; 22 दिवसांनंतरही दखल नाही, उपोषणकर्त्यांचा जलसमाधीचा इशारा
1

Karjat Protest : कर्जतमध्ये आंदोलन तीव्र; 22 दिवसांनंतरही दखल नाही, उपोषणकर्त्यांचा जलसमाधीचा इशारा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा धक्का! या भागातील लाखो महिलांचा 1500 रुपयांचा हप्ता बंद, काय आहे नेमकं कारण?
2

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा धक्का! या भागातील लाखो महिलांचा 1500 रुपयांचा हप्ता बंद, काय आहे नेमकं कारण?

Farmers News: 15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; शेवगावच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ
3

Farmers News: 15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; शेवगावच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ

Ashadhi Wari 2026: ‘माऊलींची सेवा हीच ईश्वरसेवा’; पत्रकार संघाचा पालखी सोहळ्यात सेवाभावी उपक्रम
4

Ashadhi Wari 2026: ‘माऊलींची सेवा हीच ईश्वरसेवा’; पत्रकार संघाचा पालखी सोहळ्यात सेवाभावी उपक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.