Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat Protest : कर्जतमध्ये आंदोलन तीव्र; 22 दिवसांनंतरही दखल नाही, उपोषणकर्त्यांचा जलसमाधीचा इशारा

कर्जत तालुक्यात विविध सामाजिक प्रश्नांवर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आज 22वा दिवस असून, प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपोषणकर्ते रमेश कदम यांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला असून, मागण्या मान्य न झाल्यास उल्हास नदीत जलसमाधी घेण्याचा इशाराही दिला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 17, 2026 | 04:41 PM
कर्जतमध्ये आंदोलन तीव्र; 22 दिवसांनंतरही दखल नाही, उपोषणकर्त्यांचा जलसमाधीचा इशारा

कर्जतमध्ये आंदोलन तीव्र; 22 दिवसांनंतरही दखल नाही, उपोषणकर्त्यांचा जलसमाधीचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • कर्जत मध्ये 22 व्या दिवशी साखळी उपोषण सुरू
  • प्रशासनाचा असहकार
  • अन्यथा जलसमाधी घेणार
कर्जत : कर्जत तालुक्यात विविध सामाजिक प्रश्नांवर उपोषण सुरू असून साखळी उपोषणे यांचे आजचे 22 वा दिवस होता. मात्र प्रशासनाला या उपोषणाबद्दल काहीही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे.तर उपोषणकर्ते रमेश कदम यांनी सोमवारपासून आमरण उपोषणाचा निर्णय जाहीर केला आहे. तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही तर उल्हास नदीमध्ये उडी मारून जलसमाधी घेणार असल्याचे जाहीर केले आहे.

कर्जत तालुक्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी कर्जत येथील लोकमान्य टिळक चौकात गेल्या २२ दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाची प्रशासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे ही साखळी उपोषणे आता आक्रमक झाले आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि कर्जतचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. नगरपरिषद रायगडचे उप जिल्हाधिकारी रवींद्र शेळके यांच्याकडे कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांच्या गलथान कारभाराविरोधात वारंवार व्हिडिओ व लेखी पुरावे देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असा आरोप करण्यात आला आहे.

Matheran News: वीकेंडला माथेरान हाऊसफुल; घाटरस्त्यावर वाहतूक कोंडी, प्रवेशद्वारावर लांबच लांब रांगा; पर्यटकांची दमछाक

कर्जत तालुक्यातील आदिवासी खातेदारांच्या ‘कलम ३६-अ आणि ३६-ब’ अंतर्गत असलेल्या व शासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे हस्तांतरित झालेल्या जमिनींची चौकशी करून त्या जमिनी मूळ आदिवासींना परत कराव्यात किंवा सरकारजमा कराव्यात अशी मागणी उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच जलसंपदा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अमित पारधे यांच्या अखत्यारीत असलेल्या नदी, नाले व कालव्यांमधील अनधिकृत बांधकामांवर आणि बेकायदेशीर माती भरावावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच पाटबंधारे विभागाच्या सल्ल्यानुसार या अनधिकृत बांधकामांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करावी, अशी मागणी तहसीलदार धनंजय जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे. मात्र तहसीलदारांकडून अद्याप कोणताही लेखी खुलासा मिळालेला नाही. रमेश कदम यांनी या संदर्भात बोलताना सांगितले की आम्ही लोकशाही मार्गाने २२ दिवस साखळी उपोषण केले, पण प्रशासनाने आम्हाला वाऱ्यावर सोडले.

त्यामुळे २० जुलैपासून आम्ही अन्नत्याग उपोषण करू आणि मागण्या मान्य न झाल्यास श्रीराम पुलावरून उल्हास नदीत जलसमाधी घेऊ.या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा आमच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास संबंधित सर्व अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा रमेश कदम व पोलीस मित्र संघटनेने दिला आहे.येत्या २० जुलै २०२६ पासून बेमुदत अन्नत्याग प्राणांतिक उपोषण सुरू करण्यात येणार नाही. तरीही मागण्या मान्य न झाल्यास थेट उल्हास नदी पात्रात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे.

Karjat News : दरडीच्या भीतीने डिकसळ-पाली हादरले; अंधारात जीव मुठीत घेऊन शाळेत आश्रय, सुविधांचा मात्र अभाव

Web Title: Karjat chain hunger strike ramesh kadam indefinite fast warning ulhas river

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • Karjat
  • maharashtra
  • raigad

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा धक्का! या भागातील लाखो महिलांचा 1500 रुपयांचा हप्ता बंद, काय आहे नेमकं कारण?
1

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा धक्का! या भागातील लाखो महिलांचा 1500 रुपयांचा हप्ता बंद, काय आहे नेमकं कारण?

Farmers News: 15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; शेवगावच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ
2

Farmers News: 15 दिवसांपासून पावसाचा पत्ता नाही; शेवगावच्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ

Ashadhi Wari 2026: ‘माऊलींची सेवा हीच ईश्वरसेवा’; पत्रकार संघाचा पालखी सोहळ्यात सेवाभावी उपक्रम
3

Ashadhi Wari 2026: ‘माऊलींची सेवा हीच ईश्वरसेवा’; पत्रकार संघाचा पालखी सोहळ्यात सेवाभावी उपक्रम

Pratap Sarnaik: महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू! Ola-Uber-Rapidoसाठी नवे नियम, चालकांना किमान 80% भाड्याची हमी
4

Pratap Sarnaik: महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू! Ola-Uber-Rapidoसाठी नवे नियम, चालकांना किमान 80% भाड्याची हमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.