Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Nirupam : “मुस्लिम मतांसाठी उबाठाने हिंदुत्वाशी गद्दारी केली”, संजय निरुपम यांची घणाघाती टीका

उबाठाच्या नेत्यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक हे कोणत्याही जाती धर्माशी संबंध नसून स्थावर मालमत्तेशी संबधित आहे. वक्फ बोर्डाच्या ताब्यात जवळपास २ लाख कोटींची जमीन आहे, असेही उबाठा नेत्यांनी म्हटले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 08, 2025 | 05:50 PM
"मुस्लिम मतांसाठी उबाठाने हिंदुत्वाशी गद्दारी केली", संजय निरुपम यांची घणाघाती टीका

"मुस्लिम मतांसाठी उबाठाने हिंदुत्वाशी गद्दारी केली", संजय निरुपम यांची घणाघाती टीका

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुस्लिम मतांसाठी बाळासाहेबांच्या विचार आणि हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्या उबाठाची हिंदू समाजातील विश्वसार्हता संपली, अशा शब्दांत शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज घणाघाती टीका केली. उबाठाच्या दुटप्पी भूमिकेवर हिंदूंमध्ये संतापाची लाट असून वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करणाऱ्या उबाठाला बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, असे निरुपम यांनी खडसावले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तसेच उबाठाच्या नेत्यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक हे कोणत्याही जाती धर्माशी संबंध नसून स्थावर मालमत्तेशी संबधित आहे. वक्फ बोर्डाच्या ताब्यात जवळपास २ लाख कोटींची जमीन आहे, असेही उबाठा नेत्यांनी म्हटले आहे. त्यावर निरुपम म्हणाले की, उबाठावाल्यांना प्रॉपर्टीमध्ये पहिल्यापासूनच इंटरेस्ट असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वक्फच्या जमीनींवर देखील उबाठाचे लक्ष होते का असा सवाल निरुपम यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी महाराष्ट्रातून असणार? फडणवीसांनी दिले थेट उत्तर; म्हणाले, “2029 मध्ये…”

मुस्लिम संघटनांनी निवडणुकीत उबाठाला फंडिंग केले होते. त्यामुळेच आता ते वक्फ बोर्ड विधेयकाबाबत सातत्याने हे विधेयक धर्माशी संबधित नसून मालमत्तेशी संबधित आहेत, अशी वक्तव्ये वारंवार करत आहेत.वक्फ विधेयकाविरोधात न्यायालयात जाणार नसल्याचे उबाठा नेतृत्वाने स्पष्ट केले आहे. यावरुन उबाठा गट मुस्लिम मतांसाठी अशी सारवासारव करत आहे, अशी टीका निरुपम यांनी केली. ते पुढे म्हणाले की, वक्फ बोर्डाकडील जमीन ही भारताची भूमी आहे. या जमिनीचा जर कोणी दुरुपयोग करत असेल, त्यात जर घोटाळा झाला असेल तर सरकारला त्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे, असे निरुपम म्हणाले.

खुलताबादचे पूर्वीचे नाव रत्नपूर होते, याबाबत शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावर उबाठा नेते देखील श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये २२ महिने मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी खुलताबादचे नामांतर का नाही केले, असा प्रश्न निरुपम यांनी उपस्थित केला. मतांसाठी मुस्लिमांचे लांगुलचालन करण्याचा प्रकार उबाठाने केला. त्याची मोठी किंमत त्यांना येत्या निवडणुकीत मोजावी लागेल, असे निरुपम म्हणाले.

पक्ष बंद व्हावा म्हणून भैय्ये प्रयत्न करणार असतील तर… सुप्रीम कोर्टातील याचिकेवर मनसेचा पलटवार

Web Title: Sanjay nirupam on ubt betrayed hindutva for muslim votes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 05:50 PM

Topics:  

  • maharashtra
  • Sanjay Nirupam
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.