Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Raut Slam K. Annamalai: ‘बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही…’; भाजप नेत्याच्या विधानावर संजय राऊतांची आगपाखड

मुंबई महाराष्ट्राच्या लोकांची नाही, तर ती कोणाची आहे? ती पाकिस्तान, बांगलादेश किंवा मलेशियाच्या लोकांची आहे का? आता हे माहित नाही की अन्नामलाई मुंबईत आहेत की कदाचित ते भीतीपोटी पळून गेले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 10, 2026 | 03:50 PM
Sanjay Raut, K Annamalai, Marathi vs non-Marathi row, Mumbai municipal elections,

Sanjay Raut, K Annamalai, Marathi vs non-Marathi row, Mumbai municipal elections,

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यात पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद पेटण्याची शक्यता
  • बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही, आंतरराष्ट्रीय शहर आहे
  • मुंबई महाराष्ट्राच्या लोकांची नाही, तर ती कोणाची आहे?
Sanjay Raut Slam on K. Annamalai: मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यात पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपने महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी इतर राज्यातील स्टार प्रचारकांना राज्यात पाचारण केलं आहे. तमिळनाडूमधील नेते के. अण्णामलाई मुंबईतील प्रभाक क्र. ४७ येथे प्रचार करण्यासाठी आले होते. प्रचारादरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलताना मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल केलेल्या विधानामुळे आता वादाची ठिणगी पडली आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, तामिळनाडूचे भाजप नेते के. अण्णामलाई यांनी प्रचारादरम्यान एका मुलाखतीत बोलताना म्हणाले होते की, ” बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही, आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराच्या महापालिकेचे बजेटच ७५ हजार कोटी इतके आहे. चेन्नई आणि बंगळुरूचे बजेच १९ हजार कोटींचे आहे. त्यामुळए या शहरांचे नियोजन करण्यासाठी चांगल्या सरकारची गरज आहे.” असे म्हटले. पण अण्णामलाई यांच्या याच विधानावरून संजय राऊत यांनी भाजपवर आगपाखड केली आहे.

 

Washim Crime: ‘छाया मोहन’ नाव गोंदलेली, डोकं ठेचलेलं, कपडे फाटलेल्या अवस्थेत…; वाशिम रेल्वे स्टेशनजवळ

संजय राऊत यांना पत्रकार परिषदेवेळी अण्णामलाई यांच्याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे यावर काय म्हणणं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काय म्हणणे आहे, सूर्य-चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे होऊ देणार नाही, असं फडणवीस म्हणत असतात, पण गर्जना चांगली असली तरी त्यांच्याच पक्षाचे नेते महाराष्ट्रात येऊन मुंबई महाराष्ट्राची नाही, असे म्हणतात. यावर त्यांनी आधी उत्तर दिले पाहिजे.

ते म्हणाले की,अन्नामलाई येऊन म्हणतात की मुंबई महाराष्ट्राच्या लोकांची नाही. जर मुंबई महाराष्ट्राच्या लोकांची नाही, तर ती कोणाची आहे? ती पाकिस्तान, बांगलादेश किंवा मलेशियाच्या लोकांची आहे का? आता हे माहित नाही की अन्नामलाई मुंबईत आहेत की कदाचित ते भीतीपोटी पळून गेले.

‘तू मारल्यासारखे कर, मी…’! टीकेची झोड उठताच BJP ला शहाणपण; आरोपी आपटेचा घेतला राजीनामा

“मुंबई महाराष्ट्राची नाही, असे विधान भाजपाचे स्टार प्रचारक करत आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. अण्णामलाई जर असे बोलत असतील, तर त्यांच्या विरोधात राज्यात गुन्हा दाखल केला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजधानीविषयी अशा प्रकारचे विधान कसे काय केले जाऊ शकते, असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी १०६ हुतात्म्यांचा अवमान झाल्याचा आरोप केला.

“मुंबईसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचा अपमान भाजपाचे अण्णामलाई यांनी केला असेल, तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी. भाजपावर जोरदार टीका करत संजय राऊत यांनी “कुठे आहे तुमचा स्वाभिमानी बाणा?” असा सवाल उपस्थित केला.

 

Web Title: Sanjay raut criticizes bjp leader k annamalai over his controversial statement regarding mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • BJP
  • BMC Election 2026
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Mira Bhayander :”प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर…”; भाजप आमदाराच्या वक्तव्यानंतर वाद चिघळळा; पुर्वेश सरनाईकांनी केली टीका
1

Mira Bhayander :”प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर…”; भाजप आमदाराच्या वक्तव्यानंतर वाद चिघळळा; पुर्वेश सरनाईकांनी केली टीका

Bihar New Cm Oath : RSS चा बॅकग्राऊंड नाही, BJP मधून सुरुवातही नाही; तरी ८ वर्षांत सम्राट चौधरी कसे ठरले प्रभावी नेता?
2

Bihar New Cm Oath : RSS चा बॅकग्राऊंड नाही, BJP मधून सुरुवातही नाही; तरी ८ वर्षांत सम्राट चौधरी कसे ठरले प्रभावी नेता?

Samrat Choudhary : सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री,भाजपचा ‘मुरेठाधारी’ चेहरा आणि सत्तेची नवी समीकरणे, राजकीय प्रवासावर एक
3

Samrat Choudhary : सम्राट चौधरी बिहारचे नवे मुख्यमंत्री,भाजपचा ‘मुरेठाधारी’ चेहरा आणि सत्तेची नवी समीकरणे, राजकीय प्रवासावर एक

Amit Shah : “जर भाजप जिंकला, तर पश्चिम बंगालचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल?” अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं…
4

Amit Shah : “जर भाजप जिंकला, तर पश्चिम बंगालचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल?” अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.