Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साताऱ्याचा पारा चढला! तापमान झाले ४२℃ पार; बेसुमार वृक्षतोड,अधिकाऱ्यांची मिलीभगत अन् नियोजनशून्य प्रशासन

महाराष्ट्रातील जनतेला ताळपल्या सुर्याने अक्षरशः हैरान केले आहे. साताऱ्यामध्ये देखील बेसुमार वृक्षतोड आणि नियोजनशून्य प्रशासन यामुळे प्रदूषण वाढीला लागून तापमान वाढ झाली आहे. याचा फटका सामान्य जनतेला बसत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 04, 2025 | 12:54 PM
Satara rise in temperature deforestation and unplanned administration increase in pollution

Satara rise in temperature deforestation and unplanned administration increase in pollution

Follow Us
Close
Follow Us:

अनिल कदम / उंब्रज : कधी नव्हे ते सातारा जिल्हा सध्या तापमान वाढीसाठी विदर्भ नागपूर बरोबर स्पर्धा करू लागल्याने जिल्ह्यातील नागरिकांना उकाडा असह्य झाला आहे.सर्वत्र एकच चर्चा आहे की यावेळी सूर्यदेव कोपले असून भयानक उन्हाळा पडला आहे. परंतु यासाठी जिल्ह्यातील नागरिक प्रशासन आणि अधिकारी कारणीभूत आहेत. महाबळेश्वर,पाटण,जावळी सारखे डोंगराळ आणि थंड हवेची ठिकाणे असताना जिल्हा ४२℃ पार करत असेल तर नक्कीच निसर्गावरील मानवी अतिक्रमण मानव जातीला संकटाच्या खाईत लोटणारे ठरत आहे नदी व नाल्याचे नैसर्गिक प्रवाह बंद केले जात आहेत. सिमेंटच्या जंगलाने निसर्गावर अतिक्रमण सुरू आहे. महामार्ग विस्तारीकरण करीत असताना हजारो झाडांच्या कत्तली केल्या जात आहेत. शहरीकरणाच्या बाजारात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून वाढते तापमान विनाशाची पहिली पायरी ठरणार आहे.

पाणी अडवा पाणी जिरवा संकल्पना महत्त्वाची

एकेकाळी सरकारची महत्वाकांक्षी योजना ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना गावोगावी जनजागृती करीत होती परंतु आधुनिकीकरण स्वीकारत असताना घराघरातील पाणी बंदीस्त नाल्यातून वाहू लागल्याने पाणी जिरण्याचे प्रमाण अत्यल्प झाले यामुळे जमिनीतील पाणी पातळी कमालीची खालावली तर आसपासची हिरवळ पुरेशा पाण्याअभावी नेस्तनाबूत झाली. यामुळे ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ सारखे प्रकल्प सिमेंट काँक्रीटच्या घरात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने अवलंबले तरच भविष्यात जमिनीची पाण्याअभावी होणारी धूप थांबणार असून यामुळे तापमान नियंत्रित राहण्यासाठी मदत होणार आहे.

बेसुमार वृक्षतोड धोक्याची

पुणे बेंगळुरू महामार्ग विस्तारीकरण होत असताना लगतची उभी असणारी महाकाय झाडे क्षणात आडवी केली होती. लाकूड तोडणाऱ्या व्यापाऱ्यांनी कोणतीही तमा न बाळगता सपासप झाडे तोडण्याच्या सपाटा लावला होता. सध्या सुरू असणारा शेंद्रे ते कागल दरम्यानचा महामार्ग भकास आणि बोडका दिसत असून तीव्र उन्हाच्या झळा लागत असताना नागरिकांना शोधून सुद्धा झाडांचा आसरा मिळत नाही. यामुळे दळणवळण महत्त्वाचे आहे. परंतु निसर्गाचा समतोल सुद्धा साधने गरजेचे बनले आहे. यामुळे बेसुमार वृक्षतोड धोक्याची
असून भविष्यात मोठे संकट निर्माण होणार असल्याची चाहूल या निमित्तानं लागली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

नियोजनशून्य प्रशासन

कोणत्याही ऋतूमध्ये सातारा जिल्ह्यातील वातावरण आल्हाददायक असते. असा समज आजपर्यंत तरी देशात विदेशात होता यासाठी ‘एक्स सर्व्हीस मेन सिटी’ असा शिक्काही जिल्ह्याला बसला होता. शांत आणि संयमी जिल्हा तसेच वातावरण सुद्धा सुंदर यामुळे वयाच्या साठीनंतर आयुष्यच्या उत्तरार्धात उत्तम निसर्ग असावा हीच वयोवृद्ध नागरिकांची अपेक्षा असते. पुणे मुंबई किंवा मोठी शहरे सोडून सातारा हीच पसंती होती. परंतु प्रशासनाच्या गलथान कारभाराने बेसुमार वृक्षतोड, डोंगरांचे सपाटीकरण, अमर्याद गौण खनिज उपसा आणि पर्यावरण विभागाची डोळेझाक यामुळे प्रदूषण वाढीला लागून तापमान वाढ झाली आहे.

शासकीय अधिकाऱ्यांची मिलीभगत

नियमांची मोडतोड करून जिल्ह्यातील कार्यकाळात वारेमाप संपत्ती जमवण्याच्या नादात शासकीय अधिकारी अनेक चुकीच्या बाबींना खतपाणी घालत असतात यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला जात आहे प्लॅस्टिक बंदी,कचऱ्याचे निर्मूलन, नदी प्रदूषण अशा कळीच्या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने दोन तीन वर्षांचा कार्यकाळ चिरीमिरी कमावून पार पाडायचा एवढा एकच उद्देश सध्या प्रचलित होताना दिसत आहे कोणीही अधिकारी प्रामाणिकपणे पर्यावरनाचा ऱ्हास होणार नाही याकडे लक्ष देत नाही परिणामी तापमान वाढीचा धोका निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

आजच्या घडीला चाळीस बेचाळीस असणारे तापमान भविष्यात पन्नाशी गाठेल त्यावेळी मानव जातीला जगणे मुश्किल होणार असून प्राणी पशु पक्षी याचे अस्तित्व संपून जाणार आहे माणसाने निसर्गावर अतिक्रमण केल्याने हे भीषण परिणाम जाणवत आहे यामुळे वेळीच सावध नाही झाल्यास विनाश अटळ आहे आणि याला जबाबदार तुम्ही आम्हीच आहे दुसरे तिसरे कोणीही नसणार आहे.

Web Title: Satara rise in temperature deforestation and unplanned administration increase in pollution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 12:54 PM

Topics:  

  • Maharashtra Temperature
  • Temperature Increase
  • weather news

संबंधित बातम्या

मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; सरासरीही गाठली नाही, तर धाराशिवमध्ये…
1

मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; सरासरीही गाठली नाही, तर धाराशिवमध्ये…

उजनी धरण 100 टक्के भरणार; वीजनिर्मिती प्रकल्पच केला गेला बंद
2

उजनी धरण 100 टक्के भरणार; वीजनिर्मिती प्रकल्पच केला गेला बंद

IMD Weather Update : उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पावसाचा जोर; उत्तराखंड राज्यासाठी हवामान विभागाकडून धोक्याची घंटा
3

IMD Weather Update : उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पावसाचा जोर; उत्तराखंड राज्यासाठी हवामान विभागाकडून धोक्याची घंटा

India Rain Alert: वरूणराजा ‘या’ दोन राज्यांची परीक्षा घेणार; IMD च्या अलर्ट ने वाढवली चिंता
4

India Rain Alert: वरूणराजा ‘या’ दोन राज्यांची परीक्षा घेणार; IMD च्या अलर्ट ने वाढवली चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.