
Vidarbha heatwave red alert 2026, Marathwada unseasonal rain yellow alert
यासंद्रभात भारतीय हवामान विभागाने आज विदर्भातील वर्धा अकोला, अमरावती या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये तापमान ४३ अंश सेल्सअसच्या पुढे गेल्याची नोंद झाली आहे. तर गडचिरोली, गोंदिया, नागपूर भंडारा आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दुसरीकडे मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
विदर्भातील पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. सातत्याने वाढत चाललेल्या उन्हामुळे विदर्भात उष्मााघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान महाराष्ट्रात उष्णेतेचे विविध पैलू अनुभवायला मिळत आहेत. विदर्भातील नागपूरसह अनेक जिल्ह्यांम्ये उष्णतेची लाट कायम राहणार असून मुंबई आणि किनारपट्टीच्या भागात प्रचंड उकाडा जाणवणार आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आज, 25 मे रोजी हवामान दमट आणि अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता असली, तरी हवेतील आर्द्रतेमुळे उष्णतेचा त्रास अधिक जाणवणार आहे.
अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीत हवेतील आर्द्रता वाढणार असून, त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा मोठा सामना करावा लागणार आहे. किनारपट्टीच्या काही भागांत संध्याकाळच्या वेळी हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, या सरींमुळे उकाड्यापासून तात्काळ दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.
काही जिल्ह्यांमध्ये काल हलक्या पावसाची नोंद झाली. अमरावती जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअसदरम्यान राहत असल्याने नागरिकांना मोठा फटका बसत आहे.