Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंदी सक्ती, जनसुरक्षा विधेयक आणि शक्तिपीठ महामार्गावर शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्याकडून भाष्य

शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jun 29, 2025 | 09:25 PM
हिंदी सक्ती, जनसुरक्षा विधेयक आणि शक्तिपीठ महामार्गावर शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्याकडून भाष्य

हिंदी सक्ती, जनसुरक्षा विधेयक आणि शक्तिपीठ महामार्गावर शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्याकडून भाष्य

Follow Us
Close
Follow Us:

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी रविवारी (दि. २९) अलिबाग येथील शेतकरी भवनमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर शासनाच्या धोरणावर जोरदार टीका केली. जनसुरक्षा विधेयक, हिंदी भाषेची सक्ती आणि शक्तीपीठ महामार्ग याविरोधात शेकापची भूमिका स्पष्ट करत त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

जनसुरक्षा विधेयक लोकशाहीविरोधी

जयंत पाटील यांनी सांगितले की, नव्याने मंजूर करण्यात आलेल्या जनसुरक्षा विधेयकामुळे देशात हुकूमशाही स्थिती निर्माण होत आहे. संप करणं, शांततेत आंदोलन करणं, मोर्चा काढणं यावर बंधन येणार आहे. आंदोलन केल्यास सहा महिने जामीन नाकारला जाऊ शकतो, ही स्थिती लोकशाहीला घातक आहे. हा कायदा कामगार, सरकारी कर्मचारी, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना दडपण्यासाठी वापरला जाणार आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

Raj Thackeray :’समितीचा अहवाल येऊ दे किंवा न येऊ दे…’; हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतरही राज ठाकरेंचा सरकारला इशारा

शेतकरी, कामगारांनी आपल्या हक्कांसाठी केलेल्या लढ्यामुळे आज अनेक कायदे अस्तित्वात आले आहेत. मात्र आता तेच कायदे मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या कायद्याच्या विरोधात शेकापसह विविध संघटना रस्त्यावर उतरणार असून, जिल्हास्तरावर जनजागृती केली जाणार आहे. सोमवारी शेकाप या विधेयकाविरोधात आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

हिंदी सक्ती म्हणजे मराठीवर अन्याय

नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्रैभाषिक योजनेखाली शाळांमध्ये पहिल्यापासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याला विरोध करत जयंत पाटील म्हणाले, “हिंदी भाषेला विरोध नाही, पण सक्तीला विरोध आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या भाषेवर गदा येईल, अशी कुठलीही योजना आम्ही मान्य करणार नाही.”

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा सल्ला न घेता हा निर्णय लादण्यात आला आहे. गुजरातसारख्या काही राज्यांना वगळून इतर ठिकाणी हिंदी सक्ती केली जात आहे, यामागे मनुवादी विचारधारा आणि छुप्या पद्धतीने संविधान बदलण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. येत्या ५ जुलैला या विरोधात डाव्या आघाडीसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.

हिंदी भाषेविरोधात शिंदेंचेही मंत्री आक्रमक; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दर्शवला विरोध

शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध

शक्तिपीठ महामार्गासाठी पिकत्या जमिनी संपादित करण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. यामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होणार असून, नदीकाठच्या गावांमध्ये पूराचा धोका वाढणार आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्ग सुस्थितीत असताना समांतर मार्गाची गरज नाही. हा महामार्ग म्हणजे निवडणुकीसाठी निधी गोळा करण्याचा एक भ्रष्ट मार्ग असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

सांगली जिल्ह्यात शेतकरी मोजणी रोखत असून, पोलिसी दडपशाहीचा वापर केला जात आहे. तरीही शेतकरी आपली जमीन देण्यास तयार नाहीत. या प्रकल्पाला शेकापचा तीव्र विरोध असून, राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला.

Web Title: Shekap general secretary jayant patil on hindi mandatory public safety bill and shaktipeeth highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 09:25 PM

Topics:  

  • jayant patil
  • Mahaharashtra Politics
  • Marathi News

संबंधित बातम्या

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
1

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको
2

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न
3

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा
4

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.