Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील राळेरास येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन पिकावर फिरवला रोटर

आता दिवस पुढे आल्याने दुबार पेरणी होणे देखील अवघड आहे. पाऊस पडत नसल्यामुळे दुसऱ्यांदा पेरणी करणे शक्य नाही.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 31, 2023 | 01:31 PM
सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील राळेरास येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील सोयाबीन पिकावर फिरवला रोटर
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : पावसाळा आधीच उशिरा सुरु झाला आहे त्यामुळे अनेक समस्येला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. काही ठिकणी तर पावसाच्या मध्यावर पाणीटंचाई जाणवला लागली आहे त्या गावांमध्ये टँकरने पाणी पोहोचवले जात आहे. पावसाळ्याच्या मध्यावर दोन महिन्यानंतर थोडासा पाऊस पडला आहे. त्या पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. नंतर पावसाने मोठा खंड दिल्याने सोयाबीन, तूर, उडीद, मूग ही पिके जवळपास गेल्यात जमा आहेत. आता दिवस पुढे आल्याने दुबार पेरणी होणे देखील अवघड आहे. पाऊस पडत नसल्यामुळे दुसऱ्यांदा पेरणी करणे शक्य नाही.

त्याचबरोबर पाऊस पडत नसल्यामुळे वैतागून सोलापूरच्या बार्शी तालुक्यामधील राळेरास येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमधील सोयाबीन पिकावर रोटर फिरवून आपला संताप व्यक्त केला आहे. पावसाने मोठ्या प्रमाणात खंड दिल्याने खरीप हंगामातील ही पिके पावसाअभावी जवळपास वाया गेली आहेत. सध्याचा काळ हा फुले लागण्याचा काळ असून या काळामध्ये पाऊस नसेल तर हिरवं दिसत असलेले आणि सुकलेले पण त्याला शेंगा येऊ न शकणारे सोयाबीन ठेवण्यात काय अर्थ असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. पुढे पाऊस पडला तर रब्बी हंगामात काही तरी करता येईल.

या परिस्थितीला वैतागून बार्शी तालुक्यातील शेतकरी संतोष शेरखाने यांनी दोन एकर, बालाजी ढवळे यांनी तीन एकर तर गणेश प्रतापराव पाटील यांनी दोन एकर क्षेत्रावरील सोयाबीन पिकावर रोटर फिरवून निसर्ग व शासनाप्रती आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Solapur farmers maharashtra government barshi soybean tur udid moong

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2023 | 01:31 PM

Topics:  

  • Barshi
  • maharashtra farmers
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

राज्यातील तब्बल 67 लाख लाडक्या बहिणींना धक्का; अनुदानाची रक्कम अद्याप नाहीच
1

राज्यातील तब्बल 67 लाख लाडक्या बहिणींना धक्का; अनुदानाची रक्कम अद्याप नाहीच

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन
2

“तुती बीजकोष, टसर रेशीम खरेदीसाठी…”; शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाचे प्रोत्साहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.