Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलेची ओढणी पीठ गिरणीच्या चाकात अडकली अन्…, गोंदियात धक्कादायक घटना

गोंदियामध्ये मोरगाव तालुक्यात एका ४५ वर्षीय महिलेचा गिरणीच्या पट्ट्यात ओढणी अडकल्यानं मृत्यू झाला आहे. धान्य दळत असताना अचानक महिलेच्या गळ्यातील ओढणी गिरणीच्या पट्ट्यात अडकली. त्यामुळे या महिलेच्या गळ्याला फास बसला आणि तिचा मृत्यू झाला.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 30, 2024 | 03:00 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडीया

फोटो सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

गिरणीच्या पट्ट्यात ओढणी अडकल्यानं एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. नीतु हर्षल उजवने असं या मृत महिलेचं नाव आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील आझाद चौकात हर्षल उजवने यांची पिठगिरणी आहे. नीतु हर्षल उजवने या नेहमी प्रमाणे या पिठगिरणीत धान्य दळण्यासाठी आल्या होत्या. मात्र यावेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. नीतु हर्षल उजवने धान्य दळत असताना अचानक त्यांची ओढणी गिरणी मशीनच्या पट्यात अडकली. त्यामुळे त्यांच्या गळ्याला फास बसला.

नीतु उजवने यांनी स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांनी लोकांना बोलावण्यासाठी आरडाओरडा देखील केला, पण गिरणीच्या आवाजामुळे नीतु उजवने यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचला नाही. अखेर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नीतु उजवने यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

जालन्यात विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्यू

जालना तालुक्यातील पाणेवाडी शिवारात विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नामदेव जंदे (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. गेल्या १५ दिवसांपासून जंदे यांच्या शेतात महावितरणच्या तारा तुटून पडल्या आहेत. याबाबत त्यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर काल जंदे त्यांच्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. यावेळी शेतात काम करत असताना अचानक त्यांना विद्युत तारेचा स्पर्श झाला आणि जंदे यांचा जागीच मुत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जंदे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Stole got stuck in the mill belt woman died on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2024 | 02:41 PM

Topics:  

  • gondiya
  • maharashtra
  • Marathi News

संबंधित बातम्या

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही
1

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही

Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला
2

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज
3

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Karjat News : तांत्रिक बिघाडाचा फटका; पर्यायी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल, उड्डाणपुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
4

Karjat News : तांत्रिक बिघाडाचा फटका; पर्यायी रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांचे हाल, उड्डाणपुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.