
गेल्या अनेक वर्षांपासून नेरळ येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम रखडलेले आहे. वारंवार रेल्वे गेट मध्ये होणारे तांत्रिक बिघाड आणि आता थेट चार दिवस बंद असल्यामुळे नेरळकरांच्या सहनशीलतेचा अंत होत आहे. रेल्वे प्रशासनाने हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे आणि रखडलेल्या उड्डाणपुलाबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
नेहमीच तांत्रिक कामाचे कारण सांगून फाटक बंद केले जाते. आता तर सलग चार दिवस फाटक बंद राहणार असल्याने आमचे दैनंदिन नियोजन कोलमडणार आहे. पर्यायी रस्त्यांची अवस्था पाहता प्रशासनाने आधी त्यांचे नियोजन करायला हवे होते.