Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऊसतोड मजुरांचा काफिला तोडणीसाठी रवाना; गाव, वाडी-तांड्यामध्ये उरले केवळ वयोवृद्ध

यावर्षी सततच्या पावसामुळे शेत शिवारात बऱ्याच दिवसांपासून पाणी साचल्यामुळे उस तोडीचा हंगाम उशिरा सुरु झाला आहे. नोव्हेंबर प्रारंभी साखर कारखान्यांनी कार्यरत होण्यास सुरुवात केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 05, 2025 | 05:26 PM
Sugarcane workers have left for the factory to harvest sugarcane maharashtra farmers

Sugarcane workers have left for the factory to harvest sugarcane maharashtra farmers

Follow Us
Follow Us:

लोहा: यावर्षी अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले असून नद्यांना पूर येऊन नदी काठ लगत शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. तर रस्ते पुराने खचले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त अल्पभूधारक शेतकरी, मजूर यांचा काफिला सहकुटुंब ऊस तोडणीसाठी परजिल्ह्यात रवाना होत असल्याचे चित्र गावोगावी दिसून येत आहे. मात्र आता गाव खेड्यात उरले आहेत ते केवळ वृद्ध मंडळी. यंदा पावसाने तसेच अतिवृष्टी मुळे शेती व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला असल्याने बळीराजा पूर्णतः भरडला गेला आहे.

अनेक मजुरांवर उपासमारीची वेळ

भरीस भर म्हणून शेतक-यांना शासनाकडून कुठे तुटपुंजी तर कुठे काहीच मदत मिळाली नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. मोठ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी सतत पाऊस होत असल्याने रब्बीचा हंगाम मागे पुढे झाला आहे. परिणामी मजुरांच्या हाताला कामे नाहीत. यावर्षी अल्पभूधारक शेतकरी, मजुरदार यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने गोरगरीब, अल्पभूधारक शेतकरी, कष्टकरी कुटुंबे कामाव्या शोधात मोठ्या शहरात तर कांहीं कुटुंबे ऊस तोडणी कामासाठी परजिल्ह्यात व लगतच्या कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यात स्थलांतर करत आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सण संपताच मजूर कारखान्याच्या दिशेने

वाडी तांड्यावरील असंख्य कुटुंबे घराला कुलूप लावून जात आहेत. नागरिकांचे अनेक काफिले टोळी करून मुकादम यांच्यामागे ऊस तोडणीसाठी जात असल्याचे चित्र असून छोटी गावे, वाडी तांडे येथे केवळ काहीं वयोवृद्ध महिला आणि पुरुष राहिले असल्याचे दिसून येत आहेत. यावर्षी सततच्या पावसामुळे शेत शिवारात बऱ्याच दिवसांपासून पाणी साचल्यामुळे उस तोडीचा हंगाम उशिरा सुरु झाला आहे. नोव्हेंबर प्रारंभी साखर कारखान्यांनी कार्यरत होण्यास सुरुवात केली आहे. दिवाळी सण संपताच उसतोड मजूर कारखान्याच्या दिशेने रवाना होत असल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे. दैनंदिन तालुक्यातील अनेक गाव खेड्यातून, वस्ती तांड्यातून ट्रक, जीप, ट्रॅक्टर मधून बिन्हाड घेऊन मजुर जात आहेत.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

राहण्याची सोय करण्याची कामे सुरू करा

आजपर्यंत शासन, प्रशासन मार्फत तसेच लोकप्रतिनिधी यांनी तालुक्यात कुठलाही मोठा कारखाना, उद्योग धंदे, व्यवसाय निर्माण केला नसल्यामुळे दररोज ग्रामीण भागातील मजुरांचे लोंढे कामाच्या शोधार्थ मेट्रो सिटी कडे धावत आहेत. लोहा तालुक्यात मजुरांना काम नसल्यामुळे व रोजगार हमीचे कामे बंद असल्यामुळे मजुरावर उपासमारीचे वेळ आली आहे. म्हणून तहसीलदारांनी रोहयोची कामे सुरू करून मजुराच्या हाताला कामे द्यावीत अशी मागणी होत आहे.

Web Title: Sugarcane workers have left for the factory to harvest sugarcane maharashtra farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 05:26 PM

Topics:  

  • maharashtra news
  • political news
  • sugarcane workers

संबंधित बातम्या

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !
1

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !

Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणजे ‘बिघडलेले शहजादे’! गृहमंत्री संसदेत येताच…; भाजप खासदाराचा घणाघात
2

Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणजे ‘बिघडलेले शहजादे’! गृहमंत्री संसदेत येताच…; भाजप खासदाराचा घणाघात

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक
3

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक

महामार्गावरील अनधिकृत ढाबे, हॉटेल्सवर लवकरच पडणार हातोडा; राज्य सरकारचे महत्त्वपूर्ण आदेश
4

महामार्गावरील अनधिकृत ढाबे, हॉटेल्सवर लवकरच पडणार हातोडा; राज्य सरकारचे महत्त्वपूर्ण आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.