Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गावांमध्ये होतेय पाण्याची चोरी! देवगडमध्ये नागरिकांना गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा

देवगड किल्ला भागामध्ये काही दिवसांपासून नळाला गढूळ आणि दूषित पाणीचा पुरवठा केला जात आहे. भाजपच्या नगरसेवकांनी वेधले मुख्याधिकारी यांचे लक्ष

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 16, 2024 | 03:37 PM
गावांमध्ये होतेय पाण्याची चोरी! देवगडमध्ये नागरिकांना गढूळ आणि दूषित पाण्याचा पुरवठा
Follow Us
Follow Us:

देवगड : देवगड प्रादेशिक नळ योजनेचे देवगड किल्ला भागामध्ये नागरिकांना गढूळ आणि दूषित पाणी येत आहे. या पाण्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपंचायतीने यावर तातडीने उपाययोजना करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपा नगरसेवकांनी मुख्याधिकारी सूरज कांबळे यांचे लक्ष वेधले.

भाजपचे गटनेते शरद टूकरूल, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, माजी नगराध्यक्षा आणि नगरसेविका ऍड प्रणाली माने, नगरसेविका तन्वी चांदोसकर, मनीषा जामसंडेकर, ऋचाली पाटकर, नगरसेवक व्हि. सी.खडपकर,भाजप महिला तालुकाध्यक्षा उष:कला केळुस्कर, अमित गोळवणकर, राजू कावले उपस्थित होते. यावेळी भाजपा नगरसेवकांनी किल्ला भागातील लोकांना नळाला येत असलेले गढूळ पाणी बॉटलमध्ये भरून आणले होते. हे गढूळ पाणी मुख्याधिकाऱ्यांना दाखवत हे पाणी लोकांनी प्यावे का? यामुळे कावीळ आणि अन्य आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लोकांना शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली.

[read_also content=”फुटबॉल लव्हर भावूक, भारतीय कर्णधार सुनील छेत्रीचा अलविदा, कधी खेळणार शेवटचा सामना https://www.navarashtra.com/sports/farewell-to-indian-football-captain-sunil-chhetri-cristiano-ronaldo-534019.html”]

पुढे त्यांनी सांगितले की, पाणी पुरवठा विभागाचे श्री चारुदत्त पारकर यांनी नळयोजना अत्यंत जीर्ण आहेत. ही पाईप लाईन 1980 ते 90 मधील जुनी पाईपलाईन आहे. गटाराच्या ठिकाणी पाईपलाईन लिकेज असल्याने गटारातील गढूळ आणि दूषित पाणी पाईपलाईन वाटे जात आहे. तसेच नळयोजना असलेल्या अन्नपूर्णा नदीचे पात्र कोरडे झाले असल्याने गढूळ पाणी येत आहे. यावर उपाय म्हणून नळावाटे येणारे पहिले १० मिनिटांचे पाणी पिण्यासाठी वापरू नये. त्यानंतर आलेले शुद्ध पाणी वापरावे, असे झाले तर हा प्रश्न सुटू शकतो.

नदीतील गाळ काढण्याचे काम दोन दिवसांत हाती घेण्यात येणार आहे. यावेळी देखील नळाला गढूळ पाणी येणार असेही ते म्हणाले. यावेळी नगरसेविका प्रणाली माने म्हणाल्या की, पाण्यामध्ये टीसीएल पावडर आणि तुरटी फिरविण्यात यावी अशी मागणी केली. दहिबांव अन्नपूर्णा नदीचे पात्र कोरडे झाले असल्याने शिरगाव पाडागर योजनेचे पाणी उपसा केले जात आहे. मात्र या योजनेवर असलेले 9 गावातील लोक पाणी चोरत असल्याने देवगडला पुरेसा पाणी पुरवठा होत नाही. पाणी चोरी होत असल्याने रात्रभर कर्मचारी गस्त घालत आहे. तरीही काही लोक पाणी चोरत आहेत. किमान पाच ठिकाणी पाणी चोरले जाते असे पारकर यांनी सांगितले. तसेच ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Supply of muddy and contaminated water to citizens in devgad sindhudurg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2024 | 03:37 PM

Topics:  

  • Devgad
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
1

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
2

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
3

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त
4

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.