
दरवाढीच्या निषेधार्थ ठाकरे गटाचा साताऱ्यात एल्गार; मोती चौकात घोषणाबाजी, अनेक मुद्द्यांवर सरकारला धरले धारेवर
सातारा : राज्यात वाढत चाललेली महागाई, स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीची प्रकरणे तसेच महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या घटनांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बुधवारी साताऱ्यात तीव्र आंदोलन छेडले. शहरातील मोती चौक परिसरात झालेल्या या आंदोलनात महायुती सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार, खासदार अनिल देसाई, उपनेते नितीन बानगुडे पाटील आणि जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. शहरप्रमुख प्रणव सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडल्याचा आरोप करण्यात आला. तसेच वारंवार समोर येणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली.
महिला आणि लहान मुलींवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबत सरकारकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. आंदोलनावेळी विविध घोषणांनी मोती चौक परिसर दणाणून गेला. सरकारच्या कारभाराविरोधात प्रतिकात्मक निषेध म्हणून नागरिकांना ‘मेलडी’ चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
अनेक शिवसैनिकांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात शिवा आरोग्य सेना जिल्हाप्रमुख निमिष शहा, तालुकाप्रमुख रमेश बोराटे, गणेश अहिवळे, अतिश ननावरे, रविराज बडदरे, शैलेश बोडके, शिवेंद्र ताटे, प्रशांत इंगळे, तेजस पिसाळ, आशिष पाटणे, जितू कांबळे, सुनील भोसले, अभिषेक भुजबळ, मोहित शहा, सुमित नाईक, अमोल कोंढाळकर यांच्यासह अनेक शिवसैनिक सहभागी झाले होते.
१२ वर्षांत जगणे ६० ते ७० टक्क्यांनी महागले
नेदरलँडमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्ध आणि जगासमोरील इतर आव्हानांचा संदर्भ देत आतापर्यंतचा सर्वात मोठा इशारा दिला. ते म्हणाले की, जगातील सातत्याने वाढणारी संकटे त्वरित थांबवली गेली नाहीत, तर गरिबीविरुद्ध दशकांच्या कठोर परिश्रमाने मिळवलेली प्रगती गंभीर धोक्यात येईल. याचा एक अर्थ असाही होतो की, भारतातून अजूनही गरिबीचे पूर्णपणे निर्मूलन झालेले नाही, तसेच मध्यमवर्गीयांचे संकट आगामी काळात अधिक वाढणार आहे. त्यांच्या या विधानामुळे भारतातील गरिबी निर्मूलन, महागाई आणि आकडेवारीचे गुंतागुंतीचे जाळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
उष्माघाताचा धोका वाढतोय; एकाच दिवशी 10 जणांचा मृत्यू, रेल्वेतच पाच जण दगावले