
कुत्र्यांच्या दहशतीने नागरिक भयभीत; कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांनी 125 हून अधिक नागरिकांचा घेतला चावा
या कुत्र्याचा वावर प्रामुख्याने संदीप हॉटेल परिसर, खडकपाडा आणि लगतच्या रस्त्यांवर असल्याचे सांगितले जात आहे. रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करून हा कुत्रा अचानक त्यांच्या अंगावर धावून जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात धाव घ्यावी लागली. या घटनांमुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये विशेष भीती निर्माण झाली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना सतर्क राहण्यास सुरुवात केली असून, रात्रीच्या वेळी या परिसरातून जाणेही अनेक जण टाळत आहेत.
Kalyan: ‘दृश्यम’ स्टाईल प्रियकराची हत्या, फ्लॅटमध्ये सडलेला मृतदेह अन् घरमालकाला दिला व्हॉईस मेसेज
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर भटक्या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे गटनेते उमेश बोरगावकर आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले.
नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर या भटक्या कुत्र्याला पकडण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आणि स्थानिक प्रशासनातील कर्मचारी रात्रभर या कुत्र्याचा शोध घेत असल्याचे सांगण्यात येते. मात्र हा कुत्रा वारंवार ठिकाण बदलत असल्याने त्याला पकडणे प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे. कुत्र्याला पकडण्यासाठी काही ठिकाणी पथके तैनात करण्यात आली असून, नागरिकांनी कुत्रा दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याऐवजी तातडीने प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन खडकपाडा पोलीस आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याचे कर्मचारी देखील रात्री परिसरात गस्त घालत होते. कुत्र्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून रात्रभर मोहीम राबवण्यात आली. अखेर रात्री नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी संबंधित भटक्या कुत्र्याला पकडण्यात यश मिळवले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी काहीसा सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
एकाच कुत्र्याने एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांना चावा घेतल्याचा दावा समोर आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांनी तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रेबीज प्रतिबंधक उपचार पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.
मात्र, या घटनेनंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाच्या भटक्या कुत्र्यांवरील नियंत्रणाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेषतः एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याचा दावा समोर आल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण आणि सुरक्षित पद्धतीने नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Ramesh Mhatre Arrest: महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेंना अटक