Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य; रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातात वाढ

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतूक कोंडी यामुळे जवळपास राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 04, 2025 | 02:53 PM
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य; रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातात वाढ
Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य
  • रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातात वाढ
  • प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांचा संताप
काशीमीरा ठाणे/ विजय काते :  मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतूक कोंडी यामुळे जवळपास राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत आहे. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी रात्री सुमारे 9 च्या सुमारास आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. काशीमीरा पोलिस ठाण्याच्या समोरून जात असलेल्या एका टेम्पोचे टायर खोल खड्ड्यात गेल्याने पडले. या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले असून चालकाने आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

Solar energy project On ST Bus : ST च्या मोकळ्या जागेवर होणार ‘सौर ऊर्जा प्रकल्प’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी दररोज छोटे-मोठे अपघात होत असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) या परिस्थितीकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. सध्या महामार्गावर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू असले, तरी काशीमीरा पोलिस ठाण्याच्या समोर सिमेंट रस्ता संपल्यानंतर लगेचच मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. याच खड्ड्यांमुळे टेम्पोचे टायर निघून पडले असल्याची माहिती मिळाली.स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत म्हटले की, “जर वेळेत हे खड्डे बुजवले असते किंवा या ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला असता, तर आज हा अपघात घडला नसता.” महामार्गावरील अपुऱ्या देखभालीमुळे नागरिकांच्या जीवाला सतत धोका निर्माण होत असून, तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Mumbai Airport News: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबरला ६ तास बंद; दोन्ही धावपट्ट्यांवर दुरुस्तीचे काम

याआधी देखील काही दिवसांपूर्वी वसईजवळ मुंबई अहमदाबाद मार्गावर दिवसरात्र होणाऱ्या वाहतूक कोंडीला जवळपासच्या गावातील गावकरी कंटाळले आणि त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं. सततच्या वाहतूक कोंडीमुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (एनएच-48) ची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दिवाळीच्या सणानिमित्ताने या वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली होती. गुजरातच्या दिशेने जाताना महाराष्ट्र राज्याच्या सीमाभागातील नायगाव-चिंचोटी-वसई परिसरातील 100 हून अधिक गावकऱ्यांनी वाहतूक कोडींना वैतागून पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी असं म्हटलं होतं की, सतत या वाहतूकीच्या समस्येंमुळे आम्हा गावकऱ्यांचे हाल होतायतं. आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी.रोजच्या त्रासाला नागरिक इतके मेटाकुटीला आले तरीही प्रशासन आमच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. ही समस्या काही क्षुल्लक नाही तरी देखील प्रशासन मूग गिळून गप्प का असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला.

पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात, ग्रामस्थांनी लिहिलं होतं की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या प्रकल्प संचालक आणि इतर अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मुंबई अहमदाबादनजीक असलेल्या गावातील रहिवाशांचे जीवन कठीण झाले आहे. “आम्ही प्रत्येकवेळी तक्रार दाखल केली आहे, परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. “या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई व्हायलाच हवी अशी आमची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. परिरसरात इतक्या मोठ्या प्रमाणात समस्या वाढत असून देखीस स्थानिक प्रशासन यावर ठोस उपाययोजना करत नसल्याने नागरिकांनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

 

Web Title: Potholes abound on mumbai ahmedabad highway accidents increase due to poor road conditions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • mumbai traffic
  • Mumbai-Ahmedabad highway

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.