Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News: वांगणीमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन, सामाजिक संघटनेने दिला शेतीचा कानमंत्र

वांगणीत बांबू लागवडीसाठी आता शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे. तसंत आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टयांमध्ये बांबू लागवड करण्याचे आवाहन देखील केलं जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 28, 2025 | 03:28 PM
Thane News: वांगणीमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन, सामाजिक संघटनेने दिला शेतीचा कानमंत्र
Follow Us
Close
Follow Us:

अंबरनाथ : वांगणीत बांबू लागवडीला चालना देण्यासाठी भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्ञानेश्वर हॉल येथे मंगळवारी (ता.२७) रोजी बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी हा भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कृषी मूल्य आयोगाचे मंत्री दर्जा प्राप्त पाशा पटेल यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष  रामभाऊ वारना यांनी आपल्या भाषणात आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टयांमध्ये बांबू लागवड करण्याचे आवाहन केले. तसेच पाशा पटेल (मंत्री दर्जा) यांनी आपल्या सखोल मार्गदर्शनात पर्यावरणातील बदल, कार्बन उत्सर्जनाचे दुष्परिणाम आणि बांबू लागवडीचे महत्त्व यावर प्रकाश टाकला. सन १७६५ मध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीपासून वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढले असून वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. त्यांनी उदाहरण देत सांगितले की, मे २०२५ मध्ये १०० वर्षात पहिल्यांदाच मुंबईमध्ये २०० मि.ली. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. २०२४ मध्ये कार्बनडायऑक्साइडचे प्रमाण ४२७ पीपीएम होते आणि ते २०५० पर्यंत ४५० पीपीएमपर्यंत पोहोचू शकते, यामुळे मानवजातीला जगणे कठीण होईल, असा इशारा त्यांनी दिला.

ठाणे जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली भेट

बांबू ही झाडे कार्बनडायऑक्साइड शोषून घेतात व ऑक्सिजन वातावरणात सोडतात. याशिवाय, बांबूपासून इथेनॉल निर्मिती करता येते. सध्या भारत सरकार आसाम राज्यात इथेनॉल निर्मितीचा कारखाना उभारत आहे. याशिवाय, बांबूपासून चष्मे, टॉवेल, टी-शर्ट, पेन, घड्याळ यांसारख्या विविध वस्तू तयार करता येतात. या वस्तूंचे प्रदर्शनही मेळाव्यात करण्यात आले होते.

गट विकास अधिकारी पंडित राठोड यांनी यावेळी माहिती दिली की, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना रु. ७,०४,६४५/- इतके अनुदान चार वर्षांच्या कालावधीत मिळू शकते. शेतकऱ्यांनी यासाठी तालुका कृषी अधिकारी, वन विभाग, पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

Rain Update : पहिल्याच पावसात उल्हासनदीने ओलांडली धोक्याची पातळी ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये अंबरनाथ तहसीलदार अमित पुरी, गट विकास अधिकारी पंडित राठोड, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारना, सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हाध्यक्ष अशोक सापटे, परीक्षेत्र वन अधिकारी संजय धारावणे, तालुका कृषी अधिकारी सिद्धार्थ क्षीरसागर, वांगणी सरपंच वनिता आढाव, तसेच तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, कृषी सहाय्यक, वन विभागाचे अधिकारी व इतर प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Thane news farmers meet organized in vangani social organization gives advice on agriculture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 03:28 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Marathi News
  • thane

संबंधित बातम्या

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन
1

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई
2

गवत खरेदीसाठी ना हरकत दाखल्यासाठी लाचेची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे
3

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी
4

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.