Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने धोरणे आखावीत; हर्षवर्धन पाटील यांची मागणी

साखर उद्योग ही एक सामाजिक चळवळ असून या माध्यमातून शेतकरी, कामगार, ऊसतोडणी मजूर, वाहतूकदार, ग्राहक, राज्य सरकार, केंद्र सरकार, आंतरराष्ट्रीय धोरण अशा सर्व बाबींचा अंतर्भाव असलेला हा उद्योग स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने धोरणे आखावीत, अशी मागणी राज्याचे माजी सहकार व संसदीय मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 27, 2022 | 08:37 PM
साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने धोरणे आखावीत; हर्षवर्धन पाटील यांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

इंदापूर : साखर उद्योग ही एक सामाजिक चळवळ असून या माध्यमातून शेतकरी, कामगार, ऊसतोडणी मजूर, वाहतूकदार, ग्राहक, राज्य सरकार, केंद्र सरकार, आंतरराष्ट्रीय धोरण अशा सर्व बाबींचा अंतर्भाव असलेला हा उद्योग स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने धोरणे आखावीत, अशी मागणी राज्याचे माजी सहकार व संसदीय मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली. इंदापूर येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील बोलत होते.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या वतीने इंधनात २० टक्के इथेनॉल मिश्रणाच्या धोरणाने साखर उद्योगाला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे. यंदा केंद्र सरकार ६०० कोटी लिटर इथेनॉल खरेदीचे टेंडर काढणार आहे. ती प्रक्रिया ऑक्टोंबर मध्ये होईल अशी माहिती दिल्लीतून मिळाली आहे. मागील वर्षी ५०० कोटी लिटरचे टेंडर होते.यामध्ये ३५ टक्के वाटा हा महाराष्ट्राने उचलला आहे. आता यंदा यामध्ये वाढ होऊन ४० टक्के होईल, अशी शक्यता आहे. त्यासह इथेनॉलच्या दरामध्ये चार रुपयांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

केंद्र सरकार साखर निर्यातीचे धोरण जाहीर करणार आहे. यंदा ५० लाख टना पेक्षा अधिक निर्यातीचे धोरण जाहीर होईल. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य द्यावे अशी आमची मागणी आहे. परदेशातून साखरेची मागणी वाढल्याने सरकारने लवकर धोरण जाहीर करावे. गेली ३५ वर्ष साखर उद्योगाला आयकराचा प्रश्न भेडसावत होता पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व सहकार मंत्री अमित शहा यांच्या प्रयत्नाने २०१६ पासून हा प्रश्न मिटला. परंतु २०१६ पूर्वीच्या आयकराबाबत ९ हजार ३०० कोटी रुपयांच्या नोटीसा राज्यातील विविध कारखान्यांना आलेल्या आहेत. याबाबतही केंद्र सरकारने निर्णय घेऊन तो आयकर माफ व्हावा, अशी मागणी पाटील त्यांनी यावेळी केली.

सहकारातून समृद्धीकडे…

नवीन राष्ट्रीय सहकार धोरण येणार असून, पूर्वी विना सहकार नही उद्धार हे घोषवाक्य होते, मात्र आता केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या संकल्पनेतून सहकारातून समृद्धीकडे हे नवीन धोरण अंमलात येत आहे. त्यामध्ये कृषी पतपुरवठ्याचा कोटा वाढ होणे आवश्यक आहे.

[read_also content=”‘त्या’ खूनाचा छडा लावण्यास डेक्कन पोलिसांना यश; गळा चिरुन केली होती तरुणाची हत्या https://www.navarashtra.com/maharashtra/deccan-polices-success-in-busting-that-murder-the-young-man-was-killed-by-slitting-his-throat-nrdm-330513.html”]

जिल्हा बँकांचे विलीनीकरण होणार नाही..

मध्यंतरी मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकांचं राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण होणार अशी चर्चा होती. याबाबत सविस्तर माहिती घेतली असता असा कोणताही निर्णय झाला नाही. तसेच विकास सोसायटी ते जिल्हा बँका व जिल्हा बँका ते राज्य सहकारी बँक हे धोरण राहणार असून, यावर नाबार्डच्या माध्यमातून नियंत्रण ठेवले जाणार आहे. केंद्र सरकारने कृषी कर्जावर तीन टक्के व्याज माफीचा निर्णय घेतला असून बँकांनीही काही प्रमाणात व्याजमाफी करून शेतकऱ्यांना अत्यल्प दराने कृषी कर्ज देण्याची आवश्यकता आहे.

Web Title: The central and state governments should devise policies to boost the sugar industry harshvardhan patils demand nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2022 | 08:37 PM

Topics:  

  • Amit Shah
  • BJP
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde
  • Harshvardhan Patil
  • narendra modi
  • Shard Pawar

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा
2

ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येणार; दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधांना मिळणार नवी दिशा

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
3

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
4

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.