Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोषण आहार आधी मुख्याध्यापक अन् शिक्षक खाणार, मगच विद्यार्थ्यांना देणार; विषबाधा टाळण्यासाठी नवा नियम

यापुढे विद्यार्थ्यांना अन्न देण्याआधी मुख्याध्यापक, शिक्षक यांनी त्या आहाराची चव घेणे आणि दर्जा तपासणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतची मानक कार्यपद्धती (एसओपी) जाहीर करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 04, 2025 | 05:25 PM
पोषण आहार आधी मुख्याध्यापक अन् शिक्षक खाणार, मगच विद्यार्थ्यांना देणार; विषबाधा टाळण्यासाठी नवा नियम

पोषण आहार आधी मुख्याध्यापक अन् शिक्षक खाणार, मगच विद्यार्थ्यांना देणार; विषबाधा टाळण्यासाठी नवा नियम

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यातील शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम रोखण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नवे नियम लागू केले आहेत. यापुढे विद्यार्थ्यांना अन्न देण्याआधी मुख्याध्यापक, शिक्षक यांनी त्या आहाराची चव घेणे आणि दर्जा तपासणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतची मानक कार्यपद्धती (एसओपी) जाहीर करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेसाठी आता अधिक दक्षता घेतली जाणार आहे.

स्वच्छता आणि दर्जा

भोजन तयार झाल्यानंतर अर्धा तास आधी शिक्षक, मुख्याध्यापक, स्वयंपाकी यांनी चव घेणे अनिवार्य, चव आणि दर्जाविषयी अभिप्राय नोंदवहीत नोंदवणे बंधनकारक, जेवणाचे नमुने हवाबंद डब्यात २४ तास ठेवणे आवश्यक, अन्नधान्य आणि साहित्य एक वर्ष मुदतीचे असणे आवश्यक आणि स्वच्छ हात आणि साबण-पाण्याची उपलब्धता बंधनकारक करण्यात आले.

उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

कोणत्याही प्रकारची विषबाधा झाल्यास आणि प्रयोगशाळा तपासणीत दोष आढळल्यास संबंधित पुरवठादारावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. शिक्षण अधिकारी दरमहा पुरवठादार गोदामांची पाहणी करणार असून, तालुका पातळीवर दर महिन्याला किमान दोन शाळांतील भोजन नमुने तपासले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी व्यापक जबाबदाऱ्या

शाळा व्यवस्थापन समितीने धान्याचा दर्जा तपासूनच स्वीकृती द्यावी, तसेच जेवणानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास झाल्यास आरोग्य केंद्राशी तत्काळ संपर्क साधावा, असेही आदेश देण्यात आले आहेत. या नव्या नियमांमुळे शालेय भोजन अधिक सुरक्षित होणार असून, शिक्षकांची भूमिका केवळ अध्यापनापुरती मर्यादित न राहता, आता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या देखरेखीपर्यंत विस्तारली जाणार आहे.

शालेय पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा

शालेय पोषण आहार खाल्ल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे प्रकार अनेक उघडकीस आले आहेत. गेल्या काही महिन्याखाली सांगलीच्या विटा येथील शासकीय निवासी शाळेतल्या 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास मुलांना देण्यात आलेल्या जेवणातून ही विषबाधा झाली होती. मुलांना मळमळ, जुलाब, पोटदुखी आणि अस्वस्थ वाटू लागल्यानंतर तातडीनं त्यांना विट्याच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. समाजकल्याण विभागाच्या विटा येथील शासकीय निवासी शाळेमध्ये हा विषबाधेचा प्रकार घडला होता. रात्री मुलांना मटणाचं जेवण देण्यात आलं होतं. त्यामुळं या जेवणातून विषबाधा झाली होती. एकाचवेळी 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं खळबळ उडाली होती. अशा घटना अनेक भागात घडल्या आहेत. विषबाधेच्या घटना रोखण्यासाठी शिक्षण विभागाने नवा नियम जाहीर केला आहे.

Web Title: The education department has taken a major decision to prevent incidents of poisoning of students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • dada bhuse
  • School
  • School news

संबंधित बातम्या

IIT बॉम्बेचे नाव बदलणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाले?
1

IIT बॉम्बेचे नाव बदलणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान, जाणून घ्या काय म्हणाले?

पुरंदर तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास
2

पुरंदर तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था; वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास

Purandar Airport : पुरंदर विमानतळप्रकरणी मोठी अपडेट; ‘या’ महिन्यापासून शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला मिळणार
3

Purandar Airport : पुरंदर विमानतळप्रकरणी मोठी अपडेट; ‘या’ महिन्यापासून शेतकऱ्यांना भूसंपादन मोबदला मिळणार

इकडचे मतदार तिकडे, तिकडचे इकडे! पुण्यात मतदार याद्यांमध्ये घोळ
4

इकडचे मतदार तिकडे, तिकडचे इकडे! पुण्यात मतदार याद्यांमध्ये घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.